शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मातोरीत शासकीय यंत्रणेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 00:17 IST

टाकीची स्वच्छता : ग्रामसेवकाचा नडला हलगर्जीपणा

 नाशिक : शहरापासून लगतच असलेल्या मातोरी गावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिकांना जुलाब, वांत्या झाल्याच्या घटनेने प्रशासकीय यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली असून, पाण्याच्या टाकीची तत्काळ स्वच्छता करण्याबरोबरच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. दूषित पाण्यामुळे अत्यवस्थ असलेल्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दूषित पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी स्वच्छ करून शनिवारी गावकऱ्यांना नाशिक महापालिकेच्या सहा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मातोरी येथील पाण्याच्या टाकीतील पाण्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नऊ वेळा नमुने घेऊन तपासणी केली असता, सदरचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला होता, परंतु ग्रामसेवकाने त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच टाकीचे पाणी पिण्यासाठी सोडले, एवढेच नव्हे तर पाणी कमी पडले म्हणून न वापरात असलेल्या विहिरीचाही त्याने वापर केल्यामुळे ही घटना घडल्याचा निष्कर्ष प्राथमिक चौकशीत काढण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शनिवारी दुसऱ्या दिवशी या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी बालकृष्णन् राधाकृष्णन्, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गट विकास अधिकारी रवींद्र परदेशी यांनी मातोरीत ठाण मांडून परिस्थितीची पाहणी केली, त्याचबरोबर दोन वैद्यकीय पथकेही तैनात ठेवली. मातोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा करण्यात आला असून, तत्काळ मदतीसाठी दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत कमालीचा फरक पडला असून, काहींना उपचारानंतर घरीही सोडण्यात आले आहे. मातोरीला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनेही तत्काळ पावले उचलण्यात आले असून, एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी शनिवारी सकाळी साफ करण्यात आली, त्याचबरोबर ज्याठिकाणी गळती होती, ती रोखण्याचे कामही हाती घेण्यात आले आहेत.ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी सहा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जयश्री चुंभळे, आमदार योगेश घोलप आदिंनी भेट देऊन रुग्णांची तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. (प्रतिनिधी)