शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सहाणेंच्या आमदारकीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती जयंत जाधव यांना दिलासा : बाद मते मोजण्यावर होणार विचार

By admin | Updated: February 21, 2015 00:54 IST

सहाणेंच्या आमदारकीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती जयंत जाधव यांना दिलासा : बाद मते मोजण्यावर होणार विचार

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाद ठरविलेली चार मते वैध ठरवित या निवडणुकीतील पराभूत सेना उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना आमदार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या स्थगितीने राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांना दिलासा मिळाला असून, पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. १३ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश केतकर यांनी शिवाजी सहाणे यांच्या बाजूने निकाल देत त्यांना आमदार म्हणून घोषित करतानाच जयंत जाधव यांना या निकालाविरुद्ध सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार जाधव यांनी गेल्या आठवड्यातच सर्वाेच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती फकीर महंमद इब्राहिम खलीपऊल्ला व न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जयंत जाधव यांनी दाखल केलेल्या अपिलात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणीत ज्याप्रमाणे शिवाजी सहाणे यांची चार मते बाद ठरविण्यात आली तसेच आपलेही सात मते बाद ठरविण्यात आले होते. त्या मुद्यावर सहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने चार बाद मते मोजून ती वैध ठरवून सहाणे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र आपलीही सात बाद मते मोजण्यात यावीत ही नैसर्गिक मागणी न्यायालयाने नाकारली परिणामी आपल्याला मत देणाऱ्या सात मतदारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली असून, उच्च न्यायालयाचा निकाल नैसर्गिक न्यायाला धरून नाही. या अपिलावर सुनावणी होऊन जाधव यांच्या वतीने अ‍ॅड. नागेश्वर राव व गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद केला, तर सहाणे यांच्या वतीने अ‍ॅड. वेणू गोपाल यांनी म्हणणे मांडून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगून जाधव यांचे अपील फेटाळून लावावे, अशी विनंती केली. परंतु न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देत पुढील सुनावणी घेण्याचे जाहीर केले. २५ मे २०१२ रोजी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी सहाणे, तर राष्ट्रवादीकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी करणारे आमदार जयंत जाधव उमेदवार होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पेरियास्वामी वेल्लरासू यांच्यासमोर झाली. यावेळी त्यांनी दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे २२१-२२१ मते मिळाल्याने टाय झाला, जिल्हाधिकाऱ्यांनी चिठ्ठी पद्धतीने कौल घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन्ही उमेदवारांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्यानंतर सहाणे यांची चिठ्ठी निघाली. परंतु ज्याच्या नावाची चिठ्ठी शिल्लक राहिली तोच उमेदवार विजयी असल्याचे सांगून वेलरासू यांनी जयंत जाधव यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यासंदर्भात अ‍ॅड. सहाणे यांनी १९ जून २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. --इन्फो---------------- न्यायदेवतेवर विश्वास न्यायदेवतेवर आपला विश्वास कायम असून, तो कालही होता. मुंबई उच्च न्यायालयानेच यापूर्वी निकाल देताना आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाला आपली बाजू रास्त वाटल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली. आता जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू. - जयंत जाधव, आमदार