शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

सहाणेंच्या आमदारकीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती जयंत जाधव यांना दिलासा : बाद मते मोजण्यावर होणार विचार

By admin | Updated: February 21, 2015 00:54 IST

सहाणेंच्या आमदारकीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती जयंत जाधव यांना दिलासा : बाद मते मोजण्यावर होणार विचार

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाद ठरविलेली चार मते वैध ठरवित या निवडणुकीतील पराभूत सेना उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना आमदार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या स्थगितीने राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांना दिलासा मिळाला असून, पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. १३ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश केतकर यांनी शिवाजी सहाणे यांच्या बाजूने निकाल देत त्यांना आमदार म्हणून घोषित करतानाच जयंत जाधव यांना या निकालाविरुद्ध सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार जाधव यांनी गेल्या आठवड्यातच सर्वाेच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती फकीर महंमद इब्राहिम खलीपऊल्ला व न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जयंत जाधव यांनी दाखल केलेल्या अपिलात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणीत ज्याप्रमाणे शिवाजी सहाणे यांची चार मते बाद ठरविण्यात आली तसेच आपलेही सात मते बाद ठरविण्यात आले होते. त्या मुद्यावर सहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने चार बाद मते मोजून ती वैध ठरवून सहाणे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र आपलीही सात बाद मते मोजण्यात यावीत ही नैसर्गिक मागणी न्यायालयाने नाकारली परिणामी आपल्याला मत देणाऱ्या सात मतदारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली असून, उच्च न्यायालयाचा निकाल नैसर्गिक न्यायाला धरून नाही. या अपिलावर सुनावणी होऊन जाधव यांच्या वतीने अ‍ॅड. नागेश्वर राव व गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद केला, तर सहाणे यांच्या वतीने अ‍ॅड. वेणू गोपाल यांनी म्हणणे मांडून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगून जाधव यांचे अपील फेटाळून लावावे, अशी विनंती केली. परंतु न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देत पुढील सुनावणी घेण्याचे जाहीर केले. २५ मे २०१२ रोजी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी सहाणे, तर राष्ट्रवादीकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी करणारे आमदार जयंत जाधव उमेदवार होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पेरियास्वामी वेल्लरासू यांच्यासमोर झाली. यावेळी त्यांनी दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे २२१-२२१ मते मिळाल्याने टाय झाला, जिल्हाधिकाऱ्यांनी चिठ्ठी पद्धतीने कौल घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन्ही उमेदवारांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्यानंतर सहाणे यांची चिठ्ठी निघाली. परंतु ज्याच्या नावाची चिठ्ठी शिल्लक राहिली तोच उमेदवार विजयी असल्याचे सांगून वेलरासू यांनी जयंत जाधव यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यासंदर्भात अ‍ॅड. सहाणे यांनी १९ जून २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. --इन्फो---------------- न्यायदेवतेवर विश्वास न्यायदेवतेवर आपला विश्वास कायम असून, तो कालही होता. मुंबई उच्च न्यायालयानेच यापूर्वी निकाल देताना आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाला आपली बाजू रास्त वाटल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली. आता जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू. - जयंत जाधव, आमदार