शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाेच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By admin | Updated: November 3, 2015 22:41 IST

मराठवाड्याचा पाणीप्रश्न : भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद

 नाशिक : मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी नाशिकच्या जलचिंतन संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. मात्र, सोडलेले पाणी पिण्यासाठीच वापरले जावे त्यासाठी मुख्य सचिवांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकमधील दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, आत्तापर्यंत ८४७ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे.मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या विषयावर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झाल्यानंतर जलचिंतन या संस्थेच्या वतीने खासदार हेमंत गोडसे आणि अभियंता राजेंद्र जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एच. एल. दत्तू आणि अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी मराठवाड्यासाठी गोदावरी मराठवाडा महामंडळाने १२.८३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास अनुमती देतानाच हे पाणी फक्त पिण्यासाठीच असेल असे स्पष्ट केले, त्यासाठी मुख्य सचिवांवर निगराणी करण्याची देण्यात आली असून, पिण्याऐवजी अन्य बाबींसाठी उपयोग होत असेल तर त्यांनी तातडीने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही निकालात म्हटले आहे. नाशिक आणि अहमदनगर येथील संघटना आणि शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात १७ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नाशिकमधून गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर, दारणा, मुकणे आणि कडवा या धरणातून पाणी सोडण्यात आले असून, त्यानंतर दोन दिवस लोकप्रतिनिधी आणि शेतकरी पाणी सोडणे थांबविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता महामंडळाच्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार आहे.आजपासून पूर्ण क्षमतेने पाणी सोडणारसर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या वादाबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यामुळे बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने केली आहे. रात्री उशिरापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाच्या कागदपत्रासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी वाट पाहत होते. न्यायालयाचा अडसर दूर झाल्याने पाणी सोडण्याशिवाय गत्यंतर नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.