शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सर्वाेच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By admin | Updated: November 3, 2015 22:41 IST

मराठवाड्याचा पाणीप्रश्न : भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद

 नाशिक : मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी नाशिकच्या जलचिंतन संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. मात्र, सोडलेले पाणी पिण्यासाठीच वापरले जावे त्यासाठी मुख्य सचिवांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकमधील दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, आत्तापर्यंत ८४७ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे.मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या विषयावर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झाल्यानंतर जलचिंतन या संस्थेच्या वतीने खासदार हेमंत गोडसे आणि अभियंता राजेंद्र जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एच. एल. दत्तू आणि अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी मराठवाड्यासाठी गोदावरी मराठवाडा महामंडळाने १२.८३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास अनुमती देतानाच हे पाणी फक्त पिण्यासाठीच असेल असे स्पष्ट केले, त्यासाठी मुख्य सचिवांवर निगराणी करण्याची देण्यात आली असून, पिण्याऐवजी अन्य बाबींसाठी उपयोग होत असेल तर त्यांनी तातडीने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही निकालात म्हटले आहे. नाशिक आणि अहमदनगर येथील संघटना आणि शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात १७ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नाशिकमधून गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर, दारणा, मुकणे आणि कडवा या धरणातून पाणी सोडण्यात आले असून, त्यानंतर दोन दिवस लोकप्रतिनिधी आणि शेतकरी पाणी सोडणे थांबविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता महामंडळाच्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार आहे.आजपासून पूर्ण क्षमतेने पाणी सोडणारसर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या वादाबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यामुळे बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने केली आहे. रात्री उशिरापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाच्या कागदपत्रासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी वाट पाहत होते. न्यायालयाचा अडसर दूर झाल्याने पाणी सोडण्याशिवाय गत्यंतर नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.