शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उन्हाळ कांदा काढणीस ‘कसमा’ पट्ट्यात सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:08 IST

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह कळवण, सटाणा, मालेगाव पसिरात तापमानाचा पारा ३५ ते ४० च्या आसपास गेल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे पालन : शेतकऱ्यांना उन्हाच्या झळा; सरासरी उत्पन्नात ४० टक्के घट

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह कळवण, सटाणा, मालेगाव पसिरात तापमानाचा पारा ३५ ते ४० च्या आसपास गेल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे.जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात सध्या उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. रोपांच्या टंचाईमुळे कांद्याच्या लागवडीत मोठी घट झाली असून, लागवड केलेला कांदादेखील काही ठिकाणी रोगामुळे निघू शकलेला नाही. त्यामुळे दरवर्षीच्यातुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनमधून शेतकामांना सवलत दिल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत तालुक्यात मजूरवर्ग तोंडालामास्क बांधून व उन्हाच्या झळा झेलत कांदा काढताना दिसतआहेत. दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून, तापलेली जमीन व त्यातून निघणाºया तप्त झळा यामुळे शेतात काम करणाºया महिला व पुरुषांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तर काढणीस आलेले कांदा पीक उन्हाच्या चटक्याने करपू नये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्या पाचटाचा वापर करताना दिसत आहेत. काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. उन्हाच्या चटक्याने शेतातील पिकेही पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत. दिवसभर काम करताना उन्हापासून रक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे. रक्षणासाठी मजूरवर्ग टोप्या-उपरण्याचा वापर करत असल्याचे दिसते आहे.बाजारभाव नसल्याने साठवणुकीवर भरकोरोनामुळे जिल्ह्यातील बारपेठा आज सुरू, चार दिवस बंद असल्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यातील शेतकºयांनी कांदा साठवणुकीवर भर दिला आहे. नगदी पीक असल्याने कांदा पिकाच्या बाजारभावावर शेतकºयांची आर्थिक गणिते अवलंबून असतात. कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते लागवड, खुरपणी, औषध फवारणी, काढणी, भरणी ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. त्यात समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. कांद्याला हमीभाव मिळेल या अपेक्षेने अनेक शतकºयांनी साठवणुकीवर भर दिला आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचे चिन्ह आहेत. ऐन जोमात असताना विविध रोगांनी कांदा पिकाला ग्रासले. परिणामी अर्धवट पीक तयार झाले. आर्थिक गणित बिघडले आहे. मजुरीचे दरही दुप्पट झाले आहे. मजुरांना मजुरी दिल्यानंतर आपल्या हातात काय राहणार, असा प्रश्न उपस्थित होतो.- बळवंत दशपुतेकांदा उत्पादक, वटार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी