शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ कांदा चाळीतच होतोय खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:14 IST

पाटोदा/मानोरी : कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत चालली ...

पाटोदा/मानोरी : कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत चालली असून, भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. यंदा उन्हाळा कांद्याच्या बियाणात फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा सुरुवातीला जमिनीतच सडून जाण्याचा प्रकार घडला होता. गुरुवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी १५०० रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला असून, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने भाव वाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. यंदा अवकाळी पावसामुळे रोपांसह बियाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची उशिरा लागवड शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. मात्र उशिरा केलेल्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याने कांदा लागवडीनंतर काही दिवसांतच कांद्यांना डोंगळे उगवल्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे बियांणामध्ये फसगत झाल्याने कांद्याचे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

--------------------

कांद्यांना डोंगळे

कांद्याना डोंगळे आल्याने यंदा कांदा साठवावा की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यासमोर उभी राहिली होती. डोंगळे आलेले कांदे आधीच पाण्याविना करपून चालले असताना त्यात डोंगळ्यांचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ कांदा साठवून ठेवल्यास कांदा लवकर खराब होण्याची धास्ती शेतकरी वर्गासमोर उभी राहिली होती मात्र भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेले हे कांदे लवकरच खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांद्यांना केलेल्या मशागतीचा उत्पादन खर्च फिटनेदेखील सध्या शेतकऱ्यांना दुरापास्त होतो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर सरासरीच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांनी कांदा साठवून ठेवावा की अल्प दरात विकावा, अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.

------------------

यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची बियाणांमध्ये फसगत झाल्याने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कांद्यांना दरही मिळत नसल्याने कांदा तसाच साठवून ठेवल्यास जास्त प्रमाणात खराब होणार असून, शासनाने भाववाढीसाठी तत्काळ नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

- मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना, येवला