शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

उन्हाळ कांदा चाळीतच होतोय खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:14 IST

पाटोदा/मानोरी : कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत चालली ...

पाटोदा/मानोरी : कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत चालली असून, भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. यंदा उन्हाळा कांद्याच्या बियाणात फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा सुरुवातीला जमिनीतच सडून जाण्याचा प्रकार घडला होता. गुरुवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी १५०० रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला असून, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने भाव वाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. यंदा अवकाळी पावसामुळे रोपांसह बियाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची उशिरा लागवड शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. मात्र उशिरा केलेल्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याने कांदा लागवडीनंतर काही दिवसांतच कांद्यांना डोंगळे उगवल्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे बियांणामध्ये फसगत झाल्याने कांद्याचे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

--------------------

कांद्यांना डोंगळे

कांद्याना डोंगळे आल्याने यंदा कांदा साठवावा की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यासमोर उभी राहिली होती. डोंगळे आलेले कांदे आधीच पाण्याविना करपून चालले असताना त्यात डोंगळ्यांचे प्रमाण अधिक असल्याने उन्हाळ कांदा साठवून ठेवल्यास कांदा लवकर खराब होण्याची धास्ती शेतकरी वर्गासमोर उभी राहिली होती मात्र भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेले हे कांदे लवकरच खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांद्यांना केलेल्या मशागतीचा उत्पादन खर्च फिटनेदेखील सध्या शेतकऱ्यांना दुरापास्त होतो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर सरासरीच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांनी कांदा साठवून ठेवावा की अल्प दरात विकावा, अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.

------------------

यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची बियाणांमध्ये फसगत झाल्याने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात कांद्यांना दरही मिळत नसल्याने कांदा तसाच साठवून ठेवल्यास जास्त प्रमाणात खराब होणार असून, शासनाने भाववाढीसाठी तत्काळ नियोजन करणे गरजेचे झाले आहे.

- मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना, येवला