शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

कळवण तालुक्यात दोघा शेतकऱ्यांची आत्महत्त्या

By admin | Updated: April 13, 2017 19:02 IST

कळवण तालुक्यात दोघा शेतकऱ्यांची आत्महत्त्या

नाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र सुरूच असून, कळवण तालुक्यात लागोपाठ दोन दिवस दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याने जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २१च्या घरात पोहोचली आहे. या दोन्ही आत्महत्त्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविला आहे. कळवण तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्याची घटना दुर्मिळ मानली जात होती. तथापि, सधन असलेल्या निफाड तालुक्याप्रमाणे कळवण तालुक्यातील शेतकरीही आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासनाच्या दृष्टीने ती चिंतेची बाब मानली जात आहे. भाऊसाहेब चंद्राजी बंगाळ (वय ५०, रा. आठंबे) यांनी बुधवारी घरात गळफास घेतला, तर ताराचंद रामभाऊ बागुल (वय ६५, रा. नवीबेज, ता. कळवण) यांनी गुरुवारी आपल्याच शेतात गट नंबर २३० मध्ये विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. या दोन्ही आत्महत्त्यांच्या घटनेने कळवण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले असून, कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे ही घटना घडली अथवा कसे याचे चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून साधारणत: चार ते पाच शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत, त्यामुळे एप्रिलमध्येही हेच प्रमाण कायम असून, आजवर २१ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत.