शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:55 IST

गेल्या आठवड्यापासून उसंत घेतलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, बागलाण तालुक्यात एका शेतकरी महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्यांची संख्या ८५ च्या घरात पोहोचली आहे. यंदाही कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यापासून उसंत घेतलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, बागलाण तालुक्यात एका शेतकरी महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्यांची संख्या ८५ च्या घरात पोहोचली आहे. यंदाही कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.राज्य सरकारने चालू वर्षी शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ करूनही शोतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालल्याने चिंता व्यक्त केली जात असून, नाशिक जिल्ह्णात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत ८५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने सरासरी प्रत्येक महिन्याला आठ ते नऊ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. सर्वाधिक आत्महत्या बागलाण व मालेगाव तालुक्यांत झाल्या आहेत. बुधवारी बागलाण तालुक्यातील वरचे टेंभे येथे राहणारी भारती दादाजी पाथरे (३५) या तरुण शेतकरी महिलेने स्वत:च्या शेतातील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या नावावर सोसायटीचे ७० हजार रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वीही निफाड तालुक्यातील करंजगाव येथील अनिता अंबादास चव्हाण (४३) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्णात यंदा दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात जिल्ह्णात ८७ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या. यंदा जून महिन्यापासूनच जिल्ह्णात समाधानकारक व सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झालेला असतानाही शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेचे प्रयत्न कागदोपत्रीच ठरले आहे.