शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

जवानाच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर आत्महत्येचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२७) यांचे १९ ऑक्टोबर २०१९ रोजी अरुणाचल ...

चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२७) यांचे १९ ऑक्टोबर २०१९ रोजी अरुणाचल प्रदेशातील टेंगा व्हॅली येथे लष्करी छावणीमध्ये संशयास्पद स्थितीत निधन झाले होते. दिनांक २२ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. लष्करी छावणीमध्ये त्यांनी संशयास्पद स्थितीत आत्महत्या केल्याची बाब वाळुंज यांच्या कुटुंबाच्या लक्षात येताच तेव्हापासून या दिशेने त्यांनी चौकशी केली. याप्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर चौघांवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन हा त्याच्या पत्नीच्या वैवाहिक वादामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे लष्कराच्या अंतर्गत चौकशी अहवालात (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) स्पष्ट झाले आहे. अर्जुनचा दिनांक १७ एप्रिल २०१९ रोजी पुनम उत्तम पाटील (रा. आसरखेडे, ता. चांदवड) हिच्याशी विवाह झाला होता.

याप्रकरणी मृत अर्जुनचा भाऊ सागर वाळुंज याने अरूणाचल प्रदेशमधील रूपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी अर्ज दिला होता. लष्कराचा चौकशी अहवाल, अर्जुनचे शेवटचे कॉल संभाषण आणि इतर काही सर्व पुरावे बघता पोलिसांनी तब्बल दोन वर्षांनंतर दिनांक २२ जून २०२१ रोजी उत्तम पाटील / गांडुळे (सासरा), पुनम पाटील (पत्नी), अमोल पाटील (मेहुणा) व जालिंदर वाघचौरे (साडू) यांच्या विरूद्ध अर्जुनला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६प्रमाणे गुन्हा नोंदवून या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

(13 एम.एम.जी.2)