शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

दिवाळी सुरू होऊनही साखर गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:32 IST

दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे.

नाशिक : दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे.  सणासुदीतच साखर मिळणार नसेल तर नंतर उपयोग काय, असा सवाल करून रेशनच्या साखरेचा काळाबाजार होण्याची शंकाही या निमित्ताने व्यक्त केली जात  आहे.  सरकारने रेशनवरील धान्यव साखरेची थेट दुकानापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली असून, ठेकेदाराने जर साखर पुरविलीच नाही तर दुकानदार कोठून विकणार, असा सवाल दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.  केंद्र सरकारने दारिद्र्य-रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना दरमहा रेशनवरून स्वस्त दरात साखर देण्यासाठी दिले जाणारे अनुदान राज्य सरकारला देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारने सध्या फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींसाठी लागणाºया साखरेचा कोटा मंजूर केला आहे.  नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या एक लाख ७९ हजार ४०८ शिधापत्रिका असून, त्यासाठी शासनाने ५३९२ मेट्रिक टन साखर मंजूर करून जिल्ह्याच्या ताब्यात दिली. सदरची साखर त्या-त्या तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संख्येच्या प्रमाणात तालुक्यांच्या शासकीय गुदामात रवाना झाल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे म्हणणे आहे.