शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

दिवाळी सुरू होऊनही साखर गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:32 IST

दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे.

नाशिक : दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे.  सणासुदीतच साखर मिळणार नसेल तर नंतर उपयोग काय, असा सवाल करून रेशनच्या साखरेचा काळाबाजार होण्याची शंकाही या निमित्ताने व्यक्त केली जात  आहे.  सरकारने रेशनवरील धान्यव साखरेची थेट दुकानापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली असून, ठेकेदाराने जर साखर पुरविलीच नाही तर दुकानदार कोठून विकणार, असा सवाल दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.  केंद्र सरकारने दारिद्र्य-रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना दरमहा रेशनवरून स्वस्त दरात साखर देण्यासाठी दिले जाणारे अनुदान राज्य सरकारला देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारने सध्या फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींसाठी लागणाºया साखरेचा कोटा मंजूर केला आहे.  नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या एक लाख ७९ हजार ४०८ शिधापत्रिका असून, त्यासाठी शासनाने ५३९२ मेट्रिक टन साखर मंजूर करून जिल्ह्याच्या ताब्यात दिली. सदरची साखर त्या-त्या तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संख्येच्या प्रमाणात तालुक्यांच्या शासकीय गुदामात रवाना झाल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे म्हणणे आहे.