शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुळे कालवा सात वर्षांपासून कोरडा!

By admin | Updated: February 16, 2017 22:41 IST

पिळकोस : आवर्तन नसल्याने शेतकऱ्यांत संताप

 पिळकोस : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा कालव्याला रब्बीसाठी आवर्तन मिळावे यासाठी पिळकोस, विसापूर, चाचेर, धनगरपाडा, खामखेडा या परिसरातील शेतकरी बांधवांनी संबंधित कळवण पाटबंधारे विभागाला पाणी मागणी अर्ज भरूनदेखील सुळे डाव्या कालव्याला रब्बीसाठी सात वर्षांपासून आवर्तन सोडले जात नसल्याने पिळकोस, खामखेडा व परिसरातील शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरातील विहिरींची पातळीही खोल गेली असून, या परिसरातील बहुतेक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. सुळे डाव्या कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील पिकांना शेवटचे पाणी देण्याची गरज असताना परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने कालव्याला आवर्तन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या नियमानुसार मोठ्या प्रमाणात पाणी मागणी अर्ज भरले असूनही, पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला जात आहे.पिकांना पाण्याची गरज असताना विहिरींची पातळी खोल गेली असताना, सुळे डाव्या कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रब्बीचे पहिले आवर्तन हे तत्काळ मिळावे यासाठीचे सातबारे जोडून पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाला देऊनही संबंधित विभागाकडून कारण देऊन वेळ निभावून नेली जात असून, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा कालव्याच्या साफसफाईचे कारण दिले. नंतर कालव्याचा भराव भरावा लागणार असल्याचे कारण पुढे केले; मात्र आता कालव्याची साफसफाई झाली आहे. कालव्याचे फुटलेले सर्व भरावही बुजविण्यात आलेले आहे तरीदेखील कालव्याला पाणी सोडले जात नसून, पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत कालव्याला पाणी सोडावे व परिसरातील गावातील लहान मोठी धरणे, नाले भरून मिळावे, अशी मागणी या परिसरातील साहेबराव जाधव, शांताराम जाधव, सुरेश जाधव, अभिमन जाधव, दादाजी जाधव, श्रीधर वाघ, निवृत्ती जाधव, मुरलीधर वाघ, केवळ वाघ, प्रभाकर जाधव, सचिन वाघ, ललित वाघ, हंसराज वाघ, सयाजी जाधव, उत्तम मोरे, मार्कंड जाधव, बुधा जाधव, रवींद्र वाघ, सुनील जाधव, राहुल अहेर, यांसह परिसरातील पाटक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)