शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलल्याने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:45 IST

भुसावळ-पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलला आणि मनमाडहून ही रेल्वे नगर, दौंडमार्गे पाठविण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी ताटकळले. सदरची रेल्वे परस्पर गेल्याचे कळल्यानंतर मात्र तिकिटाच्या परताव्यासाठी गोंधळ उडाला. नियोजनशून्य कारभाराबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिकरोड : भुसावळ-पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलला आणि मनमाडहून ही रेल्वे नगर, दौंडमार्गे पाठविण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी ताटकळले. सदरची रेल्वे परस्पर गेल्याचे कळल्यानंतर मात्र तिकिटाच्या परताव्यासाठी गोंधळ उडाला. नियोजनशून्य कारभाराबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.  भुसावळहून नाशिकरोडमार्गे पुण्याला जाणारी रेल्वे पहाटे पाच वाजेच्या सुमारास येथे येत असते. त्यानुसार प्रवाशांनी तिकिटे काढली होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही रेल्वे परस्पर मनमाडहून नगर, दौंडमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात नाशिकरोड स्थानकावर कोणत्याही प्रकारची उदघोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे विलंबाने रेल्वे येईल या अपेक्षेवर असलेल्या रेल्वे प्रवाशांना स्थानकावर कोणतीच माहिती मिळत नव्हती. इतकेच काय सदरची रेल्वे रद्द झाली किंवा कसे याबाबतही माहिती देण्यात आली नाही. तथापि, ही रेल्वे मनमाडमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्याचे कळताच प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला. अनेकांनी तिकिटांची रक्कम परत मागितली. परंतु ती न मिळाल्याने गोंधळ उडाला. काहींनी तक्रार वाहिनीवर संपर्क साधून तक्रार केली. त्यावेळी, परतावा मिळत नसेल तर पोलिसांत तक्रार दाखल करा, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचे काही प्रवाशांनी सांगितले, तर दुपारी १२ वाजेनंतर येथे आलेल्या प्रवाशांना तुम्ही सकाळी का परतावा मागितला नाही, असा प्रतिप्रश्न केला. दरम्यान, सायंकाळी पुण्याहून निघालेली रेल्वेही त्याच मार्गे भुसावळकडे पाठविण्यात आली. त्यामुळे सायंकाळीही गोंधळाचे वातावरण होते. गुरुवारी (दि. २) भुसावळ-पुणे रेल्वे नाशिकरोडमार्गेच जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.