शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतुलित जीवनशैलीतूनच यशाची प्राप्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:04 IST

दैनंदिन कामे करताना अनेकजण नोकरी, व्यवसाय  आणि कुटुंब यात समतोल साधू शकत नसल्याची तक्रार करतात. परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी  या दोन्ही गोष्टींना पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, वेळेचा सदुपयोग  व शिस्तबद्ध नियोजनातून संतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती शक्य असल्याचे प्रतिपादन  राज्यसभेचे खासदार तथा मोटिवेशनल स्पीकर सुभाष चंद्रा यांनी केले.

ठळक मुद्देसंतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती ‘सुभाष चंद्राज् शो’ समाधान म्हणजे समतोल म्हणता येत नाही.

 नाशिक : दैनंदिन कामे करताना अनेकजण नोकरी, व्यवसाय  आणि कुटुंब यात समतोल साधू शकत नसल्याची तक्रार करतात.परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी  या दोन्ही गोष्टींना पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, वेळेचा सदुपयोग  व शिस्तबद्ध नियोजनातून संतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती शक्य असल्याचे प्रतिपादन  राज्यसभेचे खासदार तथा मोटिवेशनल स्पीकर सुभाष चंद्रा यांनी केले.  अग्रवाल सभा व वनबंधू परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे स्वामिनारायण बॅन्क्वेट हॉलमध्ये आयोजित ‘सुभाष चंद्राज् शो’ दरम्यान ‘संतुलित जीवनशैली’ (वर्कलाइफ बॅलन्स) विषयावर ते बोलत होते. सुभाष चंद्रा म्हणाले, आयुष्यात नवीन काही सुरू करण्यासाठी जुने काही मागे ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु अशा स्थितीत येणारी आव्हाने पेलत ध्येयप्राप्तीचे लक्ष ठेवून निर्णय घेण्याची गरज असते. त्यासाठी प्रतिभा आवश्यक असते. प्रतिभा हीच प्रगतीचे सत्य असल्याचेही ते म्हणाले.  प्रारंभी अग्रवाल सभेचे नेमीचंद पोद्दार, आर्कि. सुरेश गुप्ता वनबंधू परिषदेचे सुनील चांडक, अनिल मेहता यांनी सुभाष चंद्रा यांचे स्वागत केले. दरम्यान, समाजासाठी योगदान देणाºया नरेश कारडा, श्याम ढेडिया, विजय अग्रवाल, उपासना टिबडेवाल, प्रकाश लढ्ढा, दिवाकर येवलकर आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. समाधान म्हणजे  समतोल नव्हे...अनेक व्यक्ती आयुष्य जगताना प्राप्त परिस्थितीशी समझोता करून घेतात. आपण समाधानी आहोत, असे ते म्हणतात. पण असले समाधान म्हणजे समतोल म्हणता येत नाही.  कोणाला कशासाठी होकार देणे म्हणजेच दुसºया बाजूने विचार करता अन्य कोणासाठी तो नकारही असू शकतो.   पैसा, प्रतिष्ठा व सत्ता या तिन्ही बाबी सर्वांना अपेक्षित असल्या तरी त्याचा क्रम प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा असू शकतो. काश्मिरी तरुण भारतासोबतच काश्मिरी तरुण फुटीरतावाद्यांसोबत नसून ते भारतासोबतच असल्याचे खासदार सुभाष चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. काश्मिरी मुस्लिमांना दहशतवाद नको तर शांती हवी असून, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. तसेच समाजातील क ाश्मिरी मुस्लिमांचा दहशतवादाशी संबंध असल्याचा गैरसमजही दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.