शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

संतुलित जीवनशैलीतूनच यशाची प्राप्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:04 IST

दैनंदिन कामे करताना अनेकजण नोकरी, व्यवसाय  आणि कुटुंब यात समतोल साधू शकत नसल्याची तक्रार करतात. परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी  या दोन्ही गोष्टींना पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, वेळेचा सदुपयोग  व शिस्तबद्ध नियोजनातून संतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती शक्य असल्याचे प्रतिपादन  राज्यसभेचे खासदार तथा मोटिवेशनल स्पीकर सुभाष चंद्रा यांनी केले.

ठळक मुद्देसंतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती ‘सुभाष चंद्राज् शो’ समाधान म्हणजे समतोल म्हणता येत नाही.

 नाशिक : दैनंदिन कामे करताना अनेकजण नोकरी, व्यवसाय  आणि कुटुंब यात समतोल साधू शकत नसल्याची तक्रार करतात.परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी  या दोन्ही गोष्टींना पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, वेळेचा सदुपयोग  व शिस्तबद्ध नियोजनातून संतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती शक्य असल्याचे प्रतिपादन  राज्यसभेचे खासदार तथा मोटिवेशनल स्पीकर सुभाष चंद्रा यांनी केले.  अग्रवाल सभा व वनबंधू परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे स्वामिनारायण बॅन्क्वेट हॉलमध्ये आयोजित ‘सुभाष चंद्राज् शो’ दरम्यान ‘संतुलित जीवनशैली’ (वर्कलाइफ बॅलन्स) विषयावर ते बोलत होते. सुभाष चंद्रा म्हणाले, आयुष्यात नवीन काही सुरू करण्यासाठी जुने काही मागे ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु अशा स्थितीत येणारी आव्हाने पेलत ध्येयप्राप्तीचे लक्ष ठेवून निर्णय घेण्याची गरज असते. त्यासाठी प्रतिभा आवश्यक असते. प्रतिभा हीच प्रगतीचे सत्य असल्याचेही ते म्हणाले.  प्रारंभी अग्रवाल सभेचे नेमीचंद पोद्दार, आर्कि. सुरेश गुप्ता वनबंधू परिषदेचे सुनील चांडक, अनिल मेहता यांनी सुभाष चंद्रा यांचे स्वागत केले. दरम्यान, समाजासाठी योगदान देणाºया नरेश कारडा, श्याम ढेडिया, विजय अग्रवाल, उपासना टिबडेवाल, प्रकाश लढ्ढा, दिवाकर येवलकर आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. समाधान म्हणजे  समतोल नव्हे...अनेक व्यक्ती आयुष्य जगताना प्राप्त परिस्थितीशी समझोता करून घेतात. आपण समाधानी आहोत, असे ते म्हणतात. पण असले समाधान म्हणजे समतोल म्हणता येत नाही.  कोणाला कशासाठी होकार देणे म्हणजेच दुसºया बाजूने विचार करता अन्य कोणासाठी तो नकारही असू शकतो.   पैसा, प्रतिष्ठा व सत्ता या तिन्ही बाबी सर्वांना अपेक्षित असल्या तरी त्याचा क्रम प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा असू शकतो. काश्मिरी तरुण भारतासोबतच काश्मिरी तरुण फुटीरतावाद्यांसोबत नसून ते भारतासोबतच असल्याचे खासदार सुभाष चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. काश्मिरी मुस्लिमांना दहशतवाद नको तर शांती हवी असून, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. तसेच समाजातील क ाश्मिरी मुस्लिमांचा दहशतवादाशी संबंध असल्याचा गैरसमजही दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.