शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अभ्यासाला जिद्दीची जोड दिल्यास यश : बच्छाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:29 IST

गुणगौरव कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून त्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पालकांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना त्यांचा कल लक्षात घ्यावा, अभ्यास व जिद्द यांची जोड दिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जि. प. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.

नाशिक : गुणगौरव कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून त्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पालकांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना त्यांचा कल लक्षात घ्यावा, अभ्यास व जिद्द यांची जोड दिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जि. प. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.  कालिका मंदिर सभागृहात झालेल्या खान्देश मराठा मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बच्छाव बोलत होते. बच्छाव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे त्यासाठी पालकांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष शंकर पाटील, निंबा पाटील, नवनियुक्त कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, उपाध्यक्ष सुधाकर शिसोदे, सचिव अविनाश पाटील, अशोक पाटील, बी. आर. पाटील, हेमंत शिरसाठ, शिवाजी शिसोदे, संदीप पाटील, मनोज आमले, रमेश पाटील, दीपक देसले आदी उपस्थित होते. यावेळी बच्छाव यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या माध्यमातून दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे माजी विश्वस्त पी. टी. पाटील, दहावीत १०० टक्के गुण मिळविणाऱ्या रसिका शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रवि पाटील, सुभाष चव्हाण, देवराम सैंदाणे, नारायण पाटील, यशवंत नेरकर, भाऊसाहेब पाटील, नितीन अहिरराव, नितीन पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, श्यामकांत पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक