शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

उपनगर चौक अजूनही असुरक्षित

By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST

उपनगर चौक अजूनही असुरक्षित

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर चौक सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक बनला आहे. या चौकात वाहतूक नियोजनाची नितांत गरज असतानाही त्याकडे महापालिका, तसेच वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी या चौकात अपघातात एका महिलेचा बळी गेल्यानंतर चौकातील वाहतूक नियोजनासाठी व्यवस्था केली जाईल, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या चौकात वाहतूक पोलीस दिसला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात चौकातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली होती. असे असतानाही या चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. या कालावधीत चौकात दोन किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले. सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी आणखी किती दिवस या चौकाला असुरक्षित ठेवले जाणार आहे, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिका हद्द आणि बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महामार्ग येत असल्याने समन्वयाच्या अभावामुळे संपूर्ण रस्ताच धोकादायक बनला आहे. त्यातही उपनगर चौक अत्यंत धोकादायक बनला आहे. चौकातील धोका कमी करण्यासाठी येथील रस्ता दुभाजकाची लांबी वाढविण्यात येऊन दुभाजकाचे पंक्चर संकुचित करण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी वाहतूक कोंडीतच भर पडत आहे. नाशिकरोड आणि जयभवानी रोडकडील वाहने उपनगरला वळण्यासाठी चौकात एकत्र येतात. त्यातच रस्ता ओलांडण्यासाठी अत्यंत कमी जागा असल्याने कोंडी होते. ही नित्याचीच डोकेदुखी असतानाही कुणालाही याचे गांभीर्य दिसत नाही. (प्रतिनिधी)