शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एकत्रित निवडणुकींचा विषय अदूरदर्शीपणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:45 IST

खंडप्राय देशात निवडणुका घेणे हे मोठे आव्हान मानले जाते. भारतात तर वेगवेगळे राज्य तेथील राजकीय पक्ष वेगळे मतदारांची मते वेगळी आणि अशावेळी संपूर्ण देशात एकाच वेळी म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्रातील सरकारने आग्रह सुरू केला आहे निवडणूक आयुक्तांनी त्याला अनुकूलता दर्शविली असली तरी हे शक्य नाही, व्यवहार्य तर मुळीच नाही. त्यामुळेच हा विचार अदूरदर्शीपणाचा ठरणार आहे.

श्रीधर देशपांडे ।खंडप्राय देशात निवडणुका घेणे हे मोठे आव्हान मानले जाते. भारतात तर वेगवेगळे राज्य तेथील राजकीय पक्ष वेगळे मतदारांची मते वेगळी आणि अशावेळी संपूर्ण देशात एकाच वेळी म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्रातील सरकारने आग्रह सुरू केला आहे निवडणूक आयुक्तांनी त्याला अनुकूलता दर्शविली असली तरी हे शक्य नाही, व्यवहार्य तर मुळीच नाही. त्यामुळेच हा विचार अदूरदर्शीपणाचा ठरणार आहे.  देशातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघू लागले आहे. केंद्रस्थानी असलेल्या सरकारशी संबंधितच हा विषय असताना आता सरकारकडून एकत्रित निवडणुकीचा विषय चर्चेला टाकणे हेच मुळात विरोधातील वातावरणाला बगल देण्यासारखे आहे, असा सूर उमटू लागला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अशाप्रकारच्या एकत्रित निवडणुकांसाठी तयार असल्याचे सांगून हा चेंडू सरकारच्या कोर्टातच टोलवला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे बघणे औत्सुक्याचे आहे. देशाची भौगोलिक आणि राजकीय स्थिती बघितली तरी ते व्यवहार्य नाही. त्याचे कारण म्हणजे निवडणुका घेण्यासंदर्भात राजकीय निर्णय होत असले तरी त्याची सर्व प्रशासकीय यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या अखत्यारित असते. राज्य घटनेतच याबाबत विशेष तरतूद असून निवडणूक काळात निवडणूक आयुक्तयांच्याकडे अनेक अधिकार केंद्रित झालेले असतात. आज कोणत्याही निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यामागे सर्व प्रशासकीय बाबींचा विचार करून नियोजन केले जाते. एकाच वेळी अशाप्रकारे निवडणूक घेण्याचे आयोगाने जरी ठरवले तर कोणत्याही अडचणींशिवाय या निवडणुका पार पडतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे अशाप्रकारच्या निवडणुका यापूर्वी घेण्यात आलेल्या नसल्याने पूर्वानुभव नसल्याने त्यावरून अनुमान काढणे शक्यच नाही. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून राज्यांच्या निवडणुका या वेगवेगळ्या वेळी होतात आणि एकत्रित निवडणुका घेणे म्हणजे निवडणुकींना तांत्रिक भाग म्हणून उरकणे किंवा घटनेतील मुलगामी तत्त्वांकडे दुर्लक्ष करणे करणे असेच होऊ शकते.  संपूर्ण देशातच एकाच वेळी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणूक घेताना अनेक घटनात्मक पेचदेखील निर्माण होऊ शकतात. अशाप्रकारचा निर्णय झालाच तर अनेक राज्यांमधील पक्षांना मुदतपूर्व सत्ता सोडावी लागेल किंवा काहींना मुदतवाढ द्यावी लागेल अशावेळी हा विषय राजकीयदृष्ट्या वादात पडेलच शिवाय थेट सर्वाेच्च न्यायालयातही जाईल त्यामुळे गोंधळ आणखी वाढेल.  देशापुढे महागाई बेरोजगारी, शेतीमधील अरिष्ट, कुपोषण, बालमजुरी, महागडे शिक्षण, आरोग्य हे प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते सोडून एकत्रित निवडणुकांवर चर्चा करण्यात लक्ष दिले तर मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. हे व्हावे यासाठीच हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे दिसते आहे.  (लेखक ज्येष्ठ सामाजिक  कार्यकर्ते आहेत.)