शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

येवला तालुक्यातील विद्यार्थी मोफत बसपासच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:35 IST

मानोरी : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाकडून परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास सेवेच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून येवला तालुक्यातील पाच मंडळात दुष्काळ जाहीर होऊन १ महिना उलटून गेला मात्र येवला तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थी अद्यापही परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास च्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमानोरी ते येवला अंतर २० किलोमीटर अन भाडे २५ रु पये

मानोरी : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाकडून परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास सेवेच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून येवला तालुक्यातील पाच मंडळात दुष्काळ जाहीर होऊन १ महिना उलटून गेला मात्र येवला तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थी अद्यापही परिवहन महामंडळाच्या मोफत बस पास च्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी इंधन दरात झालेल्या दर वाढीमुळे बस तिकिटात झालेल्या दर वाढीमुळे बसपासच्या दरात वाढ झाली होती. सध्या मानोरी बुद्रुक ते येवला हे अंतर २० किलोमीटर असून त्यासाठी बसला २५ रु पये एक बाजूने द्यावे लागतात. त्यामुळे बस नियमाप्रमाणे एक महिन्याला मानोरी बुद्रुक ते येवला साठी ५०० रु पये मोजावे लागत आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, सत्यगाव, देशमाने, मुखेड, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके, जळगाव नेऊर, मुखेड फाटा, नेउरगाव आदी भागातील सुमारे १५०० च्या पुढे येवला येथील महाविद्यालयीन शाळेत शिक्षण घेत आहेत. तर काही विद्यार्थी मुखेड फाटा येथून येवला मार्गे कोपरगाव येथे सुद्धा शिक्षण घेत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती मुळे एव्हडा खर्च करणे आवाक्याबाहेर झाले आहे.यातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी वर्गातील असून सुट्टीच्या दिवशी मिळेल तेथे जाऊन काम करत असतात. आणि या कामाच्या पैशातून शालेय बसपास आणि शैक्षणकि खर्च आम्ही सोडवत असल्याची खंत मानोरी च्या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे शासनाने येवला तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी रोजगार उपलब्ध करु न शाळेच्या बसपास चा खर्च सोडवत आहे. त्यात सध्या काम कराव की शाळेच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मोफत बस पास देऊन दिलासा द्यावा.- ऋ षिकेश भवर,विद्यार्थी मानोरी बु.मी दररोज मुखेड फाटा ते येवला आणि येवला ते कोपरगाव असा बस ने प्रवास करून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.एक महिन्याच्या बस पास चा खर्च १००० इतका असल्याने आत्ताच्या परिस्थितीत एव्हडा खर्च करणे अवघड झाल्याने शासनाने तात्काळ दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची गरज आहे.- ऋतिक दुघड,विद्यार्थी. मुखेड फाटा.