शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सुरगाण्यातील विद्यार्थिनींना विषबाधारुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:08 IST

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या संदर्भात अधिक वृत्त असे, माणी येथील कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्पातर्गंत येणाºया आश्रमशाळेतील ...

ठळक मुद्दे नाशिक: विद्यार्थिनींनी खिचडी खाल्ल्याने होऊ लागला त्रासआदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या संदर्भात अधिक वृत्त असे, माणी येथील कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्पातर्गंत येणाºया आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी खिचडी खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त त्रास झालेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.डॉ. मधुकर पवार, डॉ. मीनाक्षी जगताप, डॉ. लीना टाके यांनी विषबाधितांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान भाग्यश्री देशमुख हिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या आश्रमशाळेत ७७१ मुली निवासी असून, बोरपाडा येथील बंद करण्यात आलेल्या आश्रमशाळेतील दोनशे सहा मुलींचा त्यात समावेश आहे. घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार दादासाहेब गिते, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच.के. नेहते यांनी आश्रमशाळेची पाहणी केली.  मुलींमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण केवळ तीन ते चार टक्के आढळून आले. तसेच जेवणाचे ताट, स्वच्छ ठेवले जात नाही. आदि कारणामुळे त्यांना त्रास झाला असावा. अन्नाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील फॉरेन्सिक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर खरे कारण समजू शकेल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एच. के. नेहते यांनी दिली.सुरगाणा व करंजुल आश्रम शाळेतील स्वच्छते विषयी दोन महिन्यांपुर्वी कळवण प्रकल्प अधिकाºयाकडे तक्र ार केली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती. या बाबत सखोल चौकशी करण्यात यावी.- सुरेश गवळी - भाजप तालुका अध्यक्षविषबाधा झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून, दोषीवर कारवाई करावी, शासनाने स्वच्छते बाबतीत डोळेझाक करू नये, आदिवासी मुलांची हेळसांड थांबवावी. - जयश्री पवार जिल्हा परिषद सदस्याविषबाधा झालेल्या विद्यार्थिनीत कमल गोविंद भोये (११वी विज्ञान, रा. धामणकुंड), मनीषा काशीनाथ दळवी (९ वी, रा. अळीवपाडा), हेमलता रघुनाथ चौधरी (११ वी विज्ञान), भाग्यश्री दौलत देशमुख (९ वी, रा. अळीवपाडा), भाग्यश्री काशीनाथ दळवी (११ वी कला शाखा) यांच्यासह अन्य एका विद्यार्थिनींचा समावेश आहे. या शासकीय कन्या आश्रमशाळेत पाचशे विद्यार्थिनी सध्या शिक्षण घेत आहेत.