शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सुरगाण्यातील विद्यार्थिनींना विषबाधारुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:08 IST

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या संदर्भात अधिक वृत्त असे, माणी येथील कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्पातर्गंत येणाºया आश्रमशाळेतील ...

ठळक मुद्दे नाशिक: विद्यार्थिनींनी खिचडी खाल्ल्याने होऊ लागला त्रासआदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गंत येणाºया कन्या आश्रमशाळेतील सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि. १६) घडली. शासकीय पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर ही घटना घडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या संदर्भात अधिक वृत्त असे, माणी येथील कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्पातर्गंत येणाºया आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी खिचडी खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त त्रास झालेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.डॉ. मधुकर पवार, डॉ. मीनाक्षी जगताप, डॉ. लीना टाके यांनी विषबाधितांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान भाग्यश्री देशमुख हिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या आश्रमशाळेत ७७१ मुली निवासी असून, बोरपाडा येथील बंद करण्यात आलेल्या आश्रमशाळेतील दोनशे सहा मुलींचा त्यात समावेश आहे. घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार दादासाहेब गिते, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच.के. नेहते यांनी आश्रमशाळेची पाहणी केली.  मुलींमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण केवळ तीन ते चार टक्के आढळून आले. तसेच जेवणाचे ताट, स्वच्छ ठेवले जात नाही. आदि कारणामुळे त्यांना त्रास झाला असावा. अन्नाचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील फॉरेन्सिक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर खरे कारण समजू शकेल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एच. के. नेहते यांनी दिली.सुरगाणा व करंजुल आश्रम शाळेतील स्वच्छते विषयी दोन महिन्यांपुर्वी कळवण प्रकल्प अधिकाºयाकडे तक्र ार केली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती. या बाबत सखोल चौकशी करण्यात यावी.- सुरेश गवळी - भाजप तालुका अध्यक्षविषबाधा झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून, दोषीवर कारवाई करावी, शासनाने स्वच्छते बाबतीत डोळेझाक करू नये, आदिवासी मुलांची हेळसांड थांबवावी. - जयश्री पवार जिल्हा परिषद सदस्याविषबाधा झालेल्या विद्यार्थिनीत कमल गोविंद भोये (११वी विज्ञान, रा. धामणकुंड), मनीषा काशीनाथ दळवी (९ वी, रा. अळीवपाडा), हेमलता रघुनाथ चौधरी (११ वी विज्ञान), भाग्यश्री दौलत देशमुख (९ वी, रा. अळीवपाडा), भाग्यश्री काशीनाथ दळवी (११ वी कला शाखा) यांच्यासह अन्य एका विद्यार्थिनींचा समावेश आहे. या शासकीय कन्या आश्रमशाळेत पाचशे विद्यार्थिनी सध्या शिक्षण घेत आहेत.