शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

विद्यार्थ्यांनी सामाजिक हित जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 22:29 IST

महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाजिक हित जपावे, समाजाच्या हिताचातच आपले हित आहे याची जाणीव स्वयंसेवकांना असली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना खरोखरच आजच्या तरुण पिढीला एक नवी प्रेरणा नवी दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.

ठळक मुद्देनीलिमा पवार : सिन्नर महाविद्यालयाचे राष्टÑीय सेवा योजनेचे पाटोळे येथे हिवाळी शिबिर

सिन्नर : महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाजिक हित जपावे, समाजाच्या हिताचातच आपले हित आहे याची जाणीव स्वयंसेवकांना असली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना खरोखरच आजच्या तरुण पिढीला एक नवी प्रेरणा नवी दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिन्नर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोळे येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मविप्र चे संचालक हेमंत नाना वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, पाटोळे गावचे सरपंच मेघराज आव्हाड, उपसरपंच रामहरी खताळे, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील सांगळे, संतुनाना कराड, रंगनाथ खताळे, ज्ञानेश्वर खताळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजन व राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वज फडकावून करण्यात आली. मान्यवरांनी प्रतिमापूजन करून कार्यक्र माची सुरु वात केली.प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे प्रास्ताविक केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा घेत यावर्षी कोण कोणत्या स्वरूपाची कामे केली जातील याचा आढावा घेतला. आज राष्ट्राला खरी गरज आहे ती एक सज्जन निष्ठावान युवकांची आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना आपल्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. प्रा. योगेश भारस्कर व डॉ. सुरेखा जाधव सूत्रसंचालन केले. एन.एस.एस. कार्यक्र म अधिकारी प्रा. सुनील कर्डक यांनी आभार मानले. यावेळी प्रा. आर. टी. सोनवणे, प्रा. एस. जी. भागवत, प्रा. अचट यांचे सहकार्य लाभले.झाडे लावण्याचे आवाहनपाटोळे गावचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी सांगून स्वयंसेवकांनी मागील वर्षी केलेल्या कामाचे कौतुक केले. गावात रंगरंगोटी करणे, सुशोभिकरण करणे, शोष खड्डे खोदणे, वृक्षारोपण करणे तसेच गाव तळ्याचे सुशोभीकरणासाठी त्याच्या आजूबाजूला झाडे लावणे, अशीप्रस्तावित कामे सांगितली. हेमंत वाजे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांचे सामाजिक भान वाढविण्यासाठी समाजहित शिक्षण सामाजिकमूल्य राष्ट्रीय मूल्य आणि सामाजिक आरोग्य इत्यादींचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक