शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

विद्यार्थी रिकाम्या हाताने फिरले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:06 IST

जात पडताळणी प्रमाणपत्रासह समाज कल्याण खात्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून उंबरठे झिजविणाºया जिल्हाभरातील विद्यार्थी व पालकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली.

नाशिक : जात पडताळणी प्रमाणपत्रासह समाज कल्याण खात्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून उंबरठे झिजविणाºया जिल्हाभरातील विद्यार्थी व पालकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली.  गेल्या आठवड्यात जात पडताळणी समितीची बैठक होऊन त्यात प्रकरणे मंजूर करण्यात आल्याने सोमवारी प्रमाणपत्रे वाटण्याचे आश्वासन समाज कल्याण कार्यालयाने दिल्याने सकाळी दहा वाजेपासून विद्यार्थ्यांनी गर्दी केली, परंतु प्रमाणपत्र तयार नसल्याचे कारण देत त्यांना माघारी पाठविण्यात आले. दरम्यान, समाजकल्याण खात्याच्या कारभारा विषयी काही पालकांनी थेट उपायुक्त वंदना कोचुरे यांची भेट घेऊन तक्रारी केल्या असून, त्यात कर्मचाºयांकडून पैशांसाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांची परिपूर्ण प्रकरणे असतील तर त्यांना सोमवारी प्रमाणपत्रे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समाज कल्याण खात्यात गर्दी केली प्रत्यक्षात मात्र त्यांना नेहमीचीच कारणे देत बोळवण करण्यात आली. काही प्रकरणे तयार असतानाही सापडत नसल्याचे कारण देत नंतर बोलाविण्यात आले तर काहींना पुन्हा कागदपत्रे अपूर्ततेचे कारण सांगत प्रकरण मंजुरीसाठी समितीसमोर ठेवल्याचे सांगण्यात आले. सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारनंतर बोलावण्यात आले, तेव्हाही त्यांच्या पदरी निराशाच पडली. यावेळी काही विद्यार्थी व पालकांनी तेथील कर्मचाºयांशी हुज्जतही घातली. प्रत्येक वेळी कारणे देत टोलवाटोलवी केली जात असल्याची तक्रार करण्यात आली तर काही पालकांनी थेट उपआयुक्त वंदना कोचुरे यांची भेट घेत त्यांच्या कानी तक्रारी टाकल्या. यावेळी कोचुरे यांनी काही प्रकरणे मागून घेत त्यांच्यावर स्वाक्षरी करून दिल्या. तर काम न करणाºया कर्मचाºयांच्या नावे तक्रारी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पैशांसाठी कर्मचाºयांकडून अडवणूकसमाज कल्याण खात्याकडून जात पडताळणी करण्यास मुद्दाम उशीर केला जात असून, वारंवार चकरा मारूनही काम होत नसल्याचे पाहून साहजिकच विद्यार्थी व पालक वैतागतात व अशावेळी पैशांची मागणी कार्यालयातील कर्मचाºयांकडून केली जाते. खेड्यातून आलेल्या गोरगरिबांना तर व्यवस्थित मार्गदर्शन देखील केले जात नाही. उलट दुरुत्तरे करून पिटाळून लावले जाते. शासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांने शैक्षणिक नुकसान टाळावे.  - लक्ष्मण मंडाले, त्रस्त पालक