शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

सेंट्रल किचनला विद्यार्थ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:18 IST

आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सुमारे चाळीस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अचानक सेंट्रल किचनमधून जेवण पुरविण्यास सुरुवात करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण पोहचत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना घेराव घातला. विशेष म्हणजे सकाळपासून जेवणच न मिळाल्याने उपाशीपोटी आंदोलन करणाºयांपैकी एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन तो पडल्याचीही घटना घडली.

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सुमारे चाळीस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अचानक सेंट्रल किचनमधून जेवण पुरविण्यास सुरुवात करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण पोहचत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना घेराव घातला. विशेष म्हणजे सकाळपासून जेवणच न मिळाल्याने उपाशीपोटी आंदोलन करणाºयांपैकी एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन तो पडल्याचीही घटना घडली. आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला केटरर्स ठेकेदारांमार्फत जेवण पुरविले जाते. यासाठी अनेक ठेकेदार असल्याने सदर ठेकेदारांमार्फत विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन व्यवस्थेच्या माध्यमातून साउथ इंडियन नास्ता आणि जेवण मिळू लागल्याने याप्रकरणी विद्यार्थ्यांनी तक्रारही दाखल केली होती. मात्र नवीन निविदा निघाल्याने एकाच ठेकेदाराकडून जेवण येत असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते.  मात्र विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरविले जात असल्यामुळेच जेवण मिळण्याबाबत अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे तसेच साउथ इंडियन जेवण दिले जात असल्याची बाब विद्यार्थ्यांना समजली. रविवारी विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता आणि जेवणच उपलब्ध न झाल्याने या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागाचे प्रकल्प कार्यालय गाठून तीव्र घोषणाबाजी करीत सेंट्रल किचन व्यवस्था बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी सकाळपासून सुरू केलेल्या आंदोलनानंतर दुपारी प्रकल्प अधिकारी अमोल हेडगे दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला. मात्र त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन रात्री सुरूच होते.सकाळपासून उपाशीपोटी आंदोलन सुरू असल्याने आंदोलनकर्त्या एका विद्यार्थ्याला चक्कर आली. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.मंत्र्यांशी चर्चाआदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नसल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणारे लकी जाधव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या रोजच्या अन्नाचा प्रश्न असतानाही प्रशासनाकडून फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.गुन्हे दाखल कराआदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत गांभीर्य न दाखविता अचानकपणे सेंट्रल किचनची व्यवस्था करणे ही बाब म्हणजे आदिवासी वसतिगृह बंद करण्याचा शासनाचा घाट आहे. सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळत नाही. पोळ्या काळ्या पडतात. अन्न थंड असते. शिवाय साउथ इंडियन जेवण आदिवासी विद्यार्थ्यांना दिले जाते. मुलांना हे जेवण पचत नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाºया प्रकल्प अधिकाºयांवर प्रसंगी गुन्हे दाखल करा.- लकी जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी