शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

निकालाची ‘चॉइस’ विद्यार्थ्याची

By admin | Updated: June 1, 2016 00:11 IST

श्रेणी सुधारण्याची संधी : शाखा बदलण्यासाठीही परीक्षा देणे शक्य

नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याबद्दल बोर्डाला विचारणा केली, तर असंख्य विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींचीदेखील मागणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, परंतु त्यांना चांगले गुण मिळविण्याची अपेक्षा होती त्यांना श्रेणी सुधार योजनेंतर्गत आपल्या निकालाची श्रेणी सुधारण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती विभागीय सचिव मारवाडी यांनी दिली. विद्यार्थ्यांना आपल्या गुणांकामध्ये सुधारणा करण्याची संधी बोर्डाने श्रेणी सुधार योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु याविषयीची स्पष्ट कल्पना विद्यार्थ्यांना नसते, शिवाय अनेक शंकाही असतात. त्यामुळे विद्यार्थी या श्रेणी सुधार योजनेपासूनही वंचित राहतात. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती देणेही अपेक्षित असते. परंतु शाळेतून माहिती दिली जात नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. निकाल जाहीर झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला वाटले की आपल्याला कमी गुण मिळालेले आहेत, आपण यापेक्षाही चांगले गुण मिळवू शकलो असतो तर अशा विद्यार्थ्याला त्याच्या गुणांची श्रेणी सुधारण्याची संधी मिळू शकते. परंतु त्यासाठी संबंधित विद्यार्थी हा संपूर्ण विषय उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. त्याला संपूर्ण विषय घेऊनच पुनर्परीक्षा देता येते. समजा त्यास ७५ टक्के गुण मिळाले असतील आणि त्याला ८० ते ९० टक्के गुण मिळणे अपेक्षित होते, तर तो विद्यार्थी संपूर्ण विषयांची पुनर्परीक्षा देऊन आपल्या गुणात सुधारणा करवू शकतो. दुर्दैवाने तो दुसऱ्या म्हणजे पुरवणी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याचा पहिला निकाल ग्राह्य धरला जातो. त्यामुळे अनुत्तीर्ण निकालाचे महत्त्व उरत नाही. परंतु तो जर पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याला पहिल्या निकालापेक्षा जास्त किंवा कमी गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी कोणते गुणपत्रक वापरायचे याचा ‘चॉइस’ असतो. शक्यतो उत्तीर्ण झालेला विद्यार्थी श्रेणी सुधारण्याची संधी घेत नाहीत. दुसरी बाब म्हणजे पुन्हा अभ्यास करून परीक्षेला बसण्याची त्याची मानसिक तयारी नसते. परंतु जर याउपरही एखाद्या विद्यार्थ्याने श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा दिली तर ज्या गुणपत्रिकेत त्याला जास्त गुण आहेत अर्थात तीच गुणपत्रिका तो पुढे वापरू शकतो. यंदा राज्यात बारावीचा नाशिक विभागाचा निकाल सर्वांत कमी लागल्याने निकालाची चिकित्सा करावी, अशी मागणी अनेक पालकांनी केली होती, तर असंख्य विद्यार्थ्यांना अपेक्षे पेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. अशा विद्यार्थ्यांनी आता उत्तरपत्रिकांची झेरॉक्सप्रत मिळावी यासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज केले आहेत. विद्यार्थी आपली उत्तरपत्रिका आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घेऊ शकतो. बोर्डाच्या मॉडेल उत्तरपत्रिकेनुसार संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका तपासून देण्याची अपेक्षा आहे. यामुळे विद्यार्थ्याला मिळालेले गुण आणि त्याचे लिहिलेले उत्तर याची स्पष्ट कल्पना येऊ शकते. यासाठी विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स दिली जाते. (प्रतिनिधी)