शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह प्रज्ञावंत व्हावे

By admin | Updated: July 25, 2016 00:24 IST

देवयानी फरांदे : माळी समाजाकडून ४५० गुणवंतांचा गौरव

नाशिक : आजचे जग हे स्पर्धेचे असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उतरताना केवळ गुणवत्तेच्या मागे न लागता, गुणवत्तेसोबतच प्रज्ञावंत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.प. सा. नाट्यगृहात रविवारी (दि.२४) माळी समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात फरांदे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी समाज महासंघाचे सरचिटणीस अविनाश ठाकरे होते. व्यासपीठावर अखिल भारतीय समता परिषदेचे सरचिणीस डॉ. कैलास कमोद, बाळासाहेब माळी, अनंता सूर्यवंशी, संतू पाटील, दत्तात्रय माळी, सुरेश खोडे, प्रताप गायकवाड, मनीष जाधव, बाबासाहेब जेजूरकर, रंजना शेलार, सुभाष सोनवणे, कुसुम शिंदे, नगरसेवक अर्चना थोरात, संदीप लेनकर, धनंजय पवार, देवराम पवार, राजेंद्र ताजने आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. फरांदे म्हणाल्या, माळी समाजाचा इतिहास पुरोगामी विचारसरणीचा आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी सावित्रीबार्इंना शिक्षण दिले. त्यांना महिला शिक्षणासाठी प्रेरित केले. सावित्रीबार्इंनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळेच आपल्यासारखी एक महिला प्राध्यापक तसेत विधिमंडळाच्या सदस्यपदापर्यंत पोहोचू शकल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगाला सामोरे जाताना सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन रेखा महाजन यांनी केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माळी समाजाकडून दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात मयूर विधाते, रोहित घोडके, स्नेहल विधाते, सुरूची भुजबळ, सुनील अहेर, अथर्व फरांदे, आदित्य थोरात आदि विद्यार्थ्यांसह जी. पी. खैरनार यांना यावेळी गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)