शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कळवण बसस्थानकावर विद्यार्थी असुरक्षित

By admin | Updated: August 24, 2016 22:20 IST

गैरसोय : शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतरही वेळेत बसेसअभावी वेळेचा अपव्ययं

 मनोज देवरे ल्ल कळवणस्थळ : कळवण बसस्थानकवेळ : दुपारी १२ वाजताबसस्थानकावर सकाळी शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये जागा मिळावी म्हणून विद्यार्थी व विद्यार्थिनी दप्तरासह इतर वस्तू टाकतात, तर काही विद्यार्थी खिडकीतून प्रवेश करतात. गर्दीच्या या वेळेत दुचाकीस्वार या परिसरात घिरट्या घालून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार बघूनदेखील सरकारी यंत्रणाच काय; पण उपस्थित असलेली पोलीस यंत्रणादेखील बघ्याची भूमिका घेत असल्याने शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी कळवण बसस्थानकावर सुरक्षेत नापास ठरले आहेत.तालुक्यातून सवलतीच्या अहल्याबाई होळकर योजना व मानव विकास योजनेंतर्गत हजारो पासधारक विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरात येतात. तसेच तालुक्यातून हजारो पासधारक विद्यार्थी शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून शहरात येतात. एकूणच हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बसस्थानकावर सुरक्षा देणे गरजेचे असताना मात्र, कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, यासंदर्भात बसस्थानकावर घडलेल्या या प्रकाराबाबत घटनास्थळी आखो देखा हाल पहाणऱ्या एका पोलिसाला उपस्थितांनी टोकले असता त्यांनी घटनेकडे दुर्लक्ष करणे पसंत करून आपली जबाबदारी नसल्याचे दाखवून दिल्याने या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आता सुरक्षा कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानकात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाच्या दोन महिला पोलीस कर्मचारी सकाळी व दुपारी तैनात करण्याची गरज आहे. शिवाय कळवण बसस्थानकावर दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची गावाकडे जाण्यासाठी एकच गर्दी होत असल्याने या काळात कळवण पोलीस स्टेशनचे अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींचा बस पकडण्याच्या आततायीपणावर नियंत्रण येणार आहे.शहरातील विविध शाळांमधून दुपारी १२ व ५ वाजेनंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांकडे न पाहताच वाहनधारक जोरात वाहने हाकत असल्याने अपघातांचा धोका आहे. शाळा, महाविद्यालय परिसरातील रस्त्यावर उपाययोजनांची गरज आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)