शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

विद्यार्थी वाहतूकदार आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST

धूम्रपान करणाऱ्यांवर कारावाई करावी नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असूनही नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही ...

धूम्रपान करणाऱ्यांवर कारावाई करावी

नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असूनही नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी धूम्रपान करून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सर्व रिक्षाचालकांना मिळावी मदत

नाशिक : लॉकडाऊनच्या कालावधीत, तसेच त्यापूर्वीच्या काळातही रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे महानगरातील पंचवीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांना त्यांच्या कुटुंबांचे पालनपोषण करणाऱ्या रिक्षाचालकांची कुटुंबे अडचणीत सापडले आहेत. भाडेतत्त्वावर गाडी चालविणाऱ्या चालकांची तर प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे सर्वच रिक्षाचालकांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अतिवापराने नेत्रविकाराची भीती

नाशिक : कोरोनाच्या निर्बंधांमुळे मुले घरातच बंद आहेत. त्यामुळे मोबाइल, टॅब, लॅपटॉपच्या वापरासह टीव्ही पाहण्यातच त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वाढला असून, त्यांना नेत्रविकार जडू लागले असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आईस्क्रिम, लस्सी व्यवसाय थंडावला

नाशिक : शहरात निर्बंधांमुळे केवळ उन्हाळ्यात आणि त्यातही मे महिन्यात सर्वाधिक व्यवसाय होणारा आईस्क्रिम पार्लरचालक तसेच लस्सीविक्रेते, ताक विक्रेत्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. आईस्क्रिमसह सर्वच प्रकारच्या थंड पदार्थांचे सेवनही नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने कमी केले असून, त्यात मेच्या मध्यावरच पाऊस येऊन गेल्याने यंदाच्या वर्षीही पूर्ण सिझन वाया गेला आहे.

लघु व्यावसायिकांना आर्थिक मदतीची मागणी

नाशिक : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील अनेक उद्योग, व्यवसाय संकटात सापडले आहेत. निर्बंध काहीसे शिथिल केले तरी त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारने लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे

नाशिक : मुंबई-आग्रा रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्याच्या अगदी मधोमध खड्डे पडल्याने नागरिकांना अपघाताची भीती वाटते. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी सातत्याने होत असल्याने तातडीने रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.