शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

वसतिगृह विद्यार्थी मारहाण; संशयित मोकाटच

By admin | Updated: October 24, 2015 00:21 IST

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा आरोप

पंचवटी : पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील तिघा विद्यार्थ्यांना मारहाण करणारे संशयित मोकाटच असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी एका पत्रकान्वये केली आहे. पंधरवड्यापूर्वी किरकोळ कारणावरून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने पेठरोडवरील वसतिगृहातील तिघा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेत गणेश भांडकुळे, सुनील बहिरम व विवेकानंद कुवर असे तिघे जण जखमी झाले होते. या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. मारहाण करणारे टोळके हे परिसरातीलच असून, त्यांचा वारंवार या वसतिगृहाच्या आवारात वावर असतो. दिवसभर वसतिगृहाच्या परिसरात फिरणारे टोळके हे रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींचीही छेड काढत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी वसतिगृह प्रशासनाने पोलिसांची मदत घेणे गरजेचे आहे. पेठरोडवरील आदिवासी वसतिगृहात शेकडो विद्यार्थी राहत असून, परिसरातीलच गावगुंडांकडून अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मारहाणीचे तसेच शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत असल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. वसतिगृहात घडलेल्या या घटनेबाबत आदिवासी विकास विभागाने दखल घेऊन वसतिगृह परिसरात अनोळखींना प्रवेश बंदी करावी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक संख्या वाढवावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण करणारे संशयित अजून मोकाटच असून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गोवर्धने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केलेली आहे. (वार्ताहर)