शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

एसटीचा चक्का जाम

By admin | Updated: February 11, 2017 00:50 IST

भिवंडी घटनेचा निषेध : २५ बसेसला लागला ब्रेक; एकूण ७२ फेऱ्या रद्द

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाणारी शहर बससेवा दुपारपासून मंदावली. नवीन भरती झालेल्या चालक-वाहकांनी भिवंडीच्या घटनेच्या निषेधार्थ ‘दांडी’ मारली. यामुळे विविध मार्गांवरील दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतच्या एकूण २५ बसेसला ‘ब्रेक’ लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.भिवंडी येथील रिक्षाचालकांच्या मारहाणीत एका बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून नाशिक शहरातील आगार-२ मधील कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर बंद पाळला. यामुळे बससेवा चांगलीच प्रभावित झाली. सुमारे पन्नास ते साठ चालक वाहकांनी यामध्ये सहभाग घेतला असून २५ चालक कामावर हजर न राहिल्यामुळे दुपारनंतर विविध मार्गांवरील बसफेऱ्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटीला आर्थिक फटका तर बसला असून प्रवाशांचेही हाल झाले. बसचालकांनीही बंद पुकारत पोलीस व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. एसटी प्रशासनाकडून चालक-वाहकांच्या कुठल्याही समस्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्यामुळे चालक-वाहक रामभरोसे असून ज्यांच्या कष्टावर ‘एसटी’ धावते त्यांच्या तोंडाला नेहमीच प्रशासनाने पाने पुसली आहेत. यामुळे भिवंडीसारख्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. भिवंडीच्या घटनेची राज्यात कोठेही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस व परिवहन मंत्रालयाने गंभीर दखल घेण्याची मागणी चालकांनी केली आहे.पंधरवड्यापासून आगार-२ला व्यवस्थापकांची प्रतीक्षा कायम आहे. शहर बसेसच्या २५० फे ऱ्या दिवसभरात होतात. शहरी भागात वाहतूक करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते; मात्र या अडचणींवर मात करण्यासाठी गाऱ्हाणे कोणाच्या दरबारी मांडावे हा मोठा यक्ष प्रश्न असल्याचे चालकांनी सांगितले. आगारात चालकांनी मयत बसचालकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांना दिले आहे. शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांच्या नावाने नाशिक महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनाही निवेदन दिले आहे.थांबे, स्थानकांवर रिक्षाचालकांचा कब्जाशहरातील विविध बसस्थानके, थांबे, आगारांच्या परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा असून अनेकदा रिक्षाचालकांच्या मुजोरगिरीचा थेट सामना चालक-वाहकांना करावा लागतो; मात्र अधिकारी याबाबत गांभीर्याने कुठलीही कारवाई करत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ चालक-वाहकांच्या चुका काढण्यातच प्रशासनाला रस असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वप्रथम रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.