शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

एसटीचा चक्का जाम

By admin | Updated: February 11, 2017 00:50 IST

भिवंडी घटनेचा निषेध : २५ बसेसला लागला ब्रेक; एकूण ७२ फेऱ्या रद्द

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाणारी शहर बससेवा दुपारपासून मंदावली. नवीन भरती झालेल्या चालक-वाहकांनी भिवंडीच्या घटनेच्या निषेधार्थ ‘दांडी’ मारली. यामुळे विविध मार्गांवरील दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतच्या एकूण २५ बसेसला ‘ब्रेक’ लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.भिवंडी येथील रिक्षाचालकांच्या मारहाणीत एका बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून नाशिक शहरातील आगार-२ मधील कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर बंद पाळला. यामुळे बससेवा चांगलीच प्रभावित झाली. सुमारे पन्नास ते साठ चालक वाहकांनी यामध्ये सहभाग घेतला असून २५ चालक कामावर हजर न राहिल्यामुळे दुपारनंतर विविध मार्गांवरील बसफेऱ्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटीला आर्थिक फटका तर बसला असून प्रवाशांचेही हाल झाले. बसचालकांनीही बंद पुकारत पोलीस व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. एसटी प्रशासनाकडून चालक-वाहकांच्या कुठल्याही समस्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्यामुळे चालक-वाहक रामभरोसे असून ज्यांच्या कष्टावर ‘एसटी’ धावते त्यांच्या तोंडाला नेहमीच प्रशासनाने पाने पुसली आहेत. यामुळे भिवंडीसारख्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. भिवंडीच्या घटनेची राज्यात कोठेही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस व परिवहन मंत्रालयाने गंभीर दखल घेण्याची मागणी चालकांनी केली आहे.पंधरवड्यापासून आगार-२ला व्यवस्थापकांची प्रतीक्षा कायम आहे. शहर बसेसच्या २५० फे ऱ्या दिवसभरात होतात. शहरी भागात वाहतूक करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते; मात्र या अडचणींवर मात करण्यासाठी गाऱ्हाणे कोणाच्या दरबारी मांडावे हा मोठा यक्ष प्रश्न असल्याचे चालकांनी सांगितले. आगारात चालकांनी मयत बसचालकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांना दिले आहे. शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांच्या नावाने नाशिक महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनाही निवेदन दिले आहे.थांबे, स्थानकांवर रिक्षाचालकांचा कब्जाशहरातील विविध बसस्थानके, थांबे, आगारांच्या परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा असून अनेकदा रिक्षाचालकांच्या मुजोरगिरीचा थेट सामना चालक-वाहकांना करावा लागतो; मात्र अधिकारी याबाबत गांभीर्याने कुठलीही कारवाई करत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ चालक-वाहकांच्या चुका काढण्यातच प्रशासनाला रस असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वप्रथम रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.