शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा चक्का जाम

By admin | Updated: February 11, 2017 00:50 IST

भिवंडी घटनेचा निषेध : २५ बसेसला लागला ब्रेक; एकूण ७२ फेऱ्या रद्द

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाणारी शहर बससेवा दुपारपासून मंदावली. नवीन भरती झालेल्या चालक-वाहकांनी भिवंडीच्या घटनेच्या निषेधार्थ ‘दांडी’ मारली. यामुळे विविध मार्गांवरील दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतच्या एकूण २५ बसेसला ‘ब्रेक’ लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.भिवंडी येथील रिक्षाचालकांच्या मारहाणीत एका बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून नाशिक शहरातील आगार-२ मधील कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर बंद पाळला. यामुळे बससेवा चांगलीच प्रभावित झाली. सुमारे पन्नास ते साठ चालक वाहकांनी यामध्ये सहभाग घेतला असून २५ चालक कामावर हजर न राहिल्यामुळे दुपारनंतर विविध मार्गांवरील बसफेऱ्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटीला आर्थिक फटका तर बसला असून प्रवाशांचेही हाल झाले. बसचालकांनीही बंद पुकारत पोलीस व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. एसटी प्रशासनाकडून चालक-वाहकांच्या कुठल्याही समस्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्यामुळे चालक-वाहक रामभरोसे असून ज्यांच्या कष्टावर ‘एसटी’ धावते त्यांच्या तोंडाला नेहमीच प्रशासनाने पाने पुसली आहेत. यामुळे भिवंडीसारख्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. भिवंडीच्या घटनेची राज्यात कोठेही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस व परिवहन मंत्रालयाने गंभीर दखल घेण्याची मागणी चालकांनी केली आहे.पंधरवड्यापासून आगार-२ला व्यवस्थापकांची प्रतीक्षा कायम आहे. शहर बसेसच्या २५० फे ऱ्या दिवसभरात होतात. शहरी भागात वाहतूक करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते; मात्र या अडचणींवर मात करण्यासाठी गाऱ्हाणे कोणाच्या दरबारी मांडावे हा मोठा यक्ष प्रश्न असल्याचे चालकांनी सांगितले. आगारात चालकांनी मयत बसचालकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांना दिले आहे. शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांच्या नावाने नाशिक महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनाही निवेदन दिले आहे.थांबे, स्थानकांवर रिक्षाचालकांचा कब्जाशहरातील विविध बसस्थानके, थांबे, आगारांच्या परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा असून अनेकदा रिक्षाचालकांच्या मुजोरगिरीचा थेट सामना चालक-वाहकांना करावा लागतो; मात्र अधिकारी याबाबत गांभीर्याने कुठलीही कारवाई करत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ चालक-वाहकांच्या चुका काढण्यातच प्रशासनाला रस असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वप्रथम रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.