शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

संतप्त आदिवासींचा ठिय्या

By admin | Updated: August 25, 2016 00:46 IST

पोलीस बंदोबस्त : आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

सटाणा : तालुक्यातील हरणबारी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईक व शेकडो आदिवासी बांधवांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी आश्रमशाळेसमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. आक्र मक झालेल्या आदिवासी बांधवांचा संताप पाहता १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त शाळेत तैनात करण्यात आला होता.बागलाण तालुक्यातील हरणबारी शासकीय आश्रमशाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेली लीला हिरामण गांगुर्डे (वय ८,रा.ब्रिंदावन पाडे,मानूर) ही विद्यार्थिनी दोन दिवसांपूर्वी आश्रमशाळेत आजारी पडली. तिच्यावर मुल्हेर येथील आरोग्यकेंद्रात उपचार देखील करण्यात आले.मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला आश्रमशाळा प्रशासनाने सटाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले मात्र तिला अतिसार व वाणत्या जास्त प्रमाणात झाल्याने तिचा मृत्यू झाला.या संपूर्ण घटनेत जायखेडा पोलिसांनी देखील सावध भूमिका घेत मयत विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला. काल सायंकाळी लीला हिच्यावर मानूर येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज सकाळी तिच्या नातेवाईकांसह बागलाणच्या आदिवासी पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी हरणबारी आश्रमशाळेवर धाव घेत शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत तब्बल तीस तास शेकडो आदिवासींनी ठिय्या आंदोलन केले.घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मात्र आदिवासी बांधवांची संख्या पाहता त्यांनी सटाणा, वडनेर खाकुर्डी व मालेगाव येथील रिझर्व पोलीस फोर्स घटनास्थळी पाचारण केला. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार सुनील सैंदाणे, पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर,पोलीस उपनिरीक्षक के पी घायवट यांच्यासह १०० हून अधिकपोलिसांचा फौजफाटा हरणबारी आश्रमशाळेवर दाखल झाला. यावेळी बागलाण तालुका शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन, प्रदीप कांकरिया, डॉ.राजेंद्र पवार, आबा बच्छाव, सीताराम साळवे, आदिवासींचे नेते मधुकर चौधरी, भटू महाले, पोपटराव गवळी यांनी संतप्त आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र दोषींवर कारवाई केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने तहसीलदार सैंदाणे व डीवायएसपी यांनी मध्यस्थी करत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेतली. (वार्ताहर)