शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यास पाणी देण्यास तीव्र विरोध

By admin | Updated: October 19, 2015 23:43 IST

शिवसेनेचा गंगापूर धरणावर ठिय्या : काँग्रेसची निदर्शने, राष्ट्रवादीचाही कडाडून विरोध

नाशिक : मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करण्यास कॉँग्रेस- राष्ट्रवादी या विरोधकांबरोबरच सत्तारूढ शिवसेनाही सरसावली असून, सोमवारी या विरोधामुळे दिवस ढवळून निघाला. शिवसेनेच्या वतीने थेट गंगापूर धरणावरच शेतकऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन करण्यात आले, तर कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्यांसमवेत निदर्शने केली. राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतानाच नाशिकच्या हक्काचे पाणी सोडल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतानाच नाशिकच्या हक्काचे पाणी सोडल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.मराठवाड्यास पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसमवेत गंगापूर धरणाकडे कुच करीत ठिय्या दिला. मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यास नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उद््ध्वस्त होईल, असा इशारा देतानाच शिवसेनेने शासनाने स्थगिती न दिल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आणि प्रस्तावर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.शिवसेनेच्या हल्लाबोलमुळे जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अधिकाऱ्यांची समजूत काढताना त्यांना नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. तथापि, मंगळवारी (दि.२०) जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येणार असून, त्यावेळी चर्चा करावी, असा सल्ला देण्यात आला. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे.

मराठवाड्यास पाणी देण्याचा विषय सध्या पेटत असून, आता गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णय देण्याच्या विरोधात सकाळीच शिवसेनेने शेतकऱ्यांना घेऊन गंगापूर धरण गाठले. यावेळी नाशिक जिल्'ातील पाण्याच्या स्थितीची माहिती न घेता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने पाणी सोडण्याचा घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. महामंडळाने हा निर्णय घेताना नाशिकमधील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नाही, तसेच नाशिक जिल्'ावर हा एकतर्फी निर्णय लादण्यात आला आहे. तो कदापि मान्य नाही, असे मत आंदोलक नेत्यांनी व्यक्त केले. मराठवाड्यासाठी १.३६ टीएमसी पाणी सोडण्याची तयारी केली असली तरी हे पाणी तेथे पोहोचणारच नाही. त्यामुळे ८० टक्केपाण्याची गळती होणार आहे, मग पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न त्यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्'ासाठीच पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट असताना अन्य जिल्'ांसाठी पाणी सोडणे शक्य नाही, असे मत आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले, तर माजी मंत्री बबन घोलप आणि आमदार अनिल अहेर यांनीही सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. शेतकऱ्यांनी आता जनआंदोलन उभारले असून, त्यात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना साथ दिली जाईल, असा इशारा नाशिक पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले यांनी दिला. सुमारे तीन ते चार तास सुरू असलेल्या आंदोलनास नाशिकसह निफाड आणि सिन्नरमधूनही शेतकऱ्यांनी हजेरी लावली. आंदोलन सुरू असताना लोकप्रतिनिधींची समजूत काढण्याचा प्रयत्न जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला. मंगळवारी जलसंपदा मंत्र्यांंसमवेत चर्चा करावी, असे ठरल्यानंतर आंदोलक नेत्यांची येथील विश्रामगृहावर बंदिस्त बैठक झाली. त्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.राज्यातील प्रतिकूल पर्जन्यमानामुळे उद्भवलेली पाणीटंचाई लक्षात घेता तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी मागील वर्षी दिलेल्या आदेशानुसार समन्यायी पद्धतीने पाणीवाटप करण्याचे निर्देश आहेत. १५ आॅक्टोबरचा पाणीसाठ्याचा आढावा लक्षात घेऊन आॅक्टोबरअखेर धरण समूहातील पाणी सोडण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. त्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या भावना मी समजू शकतो.- गिरीश महाजन,जलसंपदामंत्री व पालकमंत्री, नाशिक