शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांच्या संपाचा बाजार समित्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:09 IST

कळवण : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगार उदध्वस्त होणार आहेत. सदर कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, या बंदमुळे कळवण बाजार समितीची सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकळवण : लिलाव बंद असल्यामुळे उलाढाल ठप्प

कळवण : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगार उदध्वस्त होणार आहेत. सदर कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, या बंदमुळे कळवण बाजार समितीची सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्याने बाजार समितीमध्ये कांदा व धान्याचे लिलाव बंद होते. केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेले बदल व नवीन कायद्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, माथाडी मंडळावर नोंदीत माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व द्यावे यासह विविध मागण्यांसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता.

कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे हा शेतमाल सरकारच्या पणन विभागाने बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांचे नुकसान होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात भिला काकुलते, गोरख, देवरे, योगेश पवार, सूरज पगार, ललित काकुलते, गिरीश पवार, लखन, कदम, नंदू आहेर, कडू, देवरे, दिलीप जाधव, मनोज आहेर, शशी पवार,योगेश बागुल, दीपक केदारे, रावसाहेब आहेर, संजय पवार, केवळ निकम, राकेश काकुलते, श्रीराम जाधव, प्रकाश रौदल, विजू देवरे, सोनू पगार, सोनू जाधव यांसह माथाडी कामगार सहभागी झाले होते. 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप