शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माथाडी कामगारांच्या संपाचा बाजार समित्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:09 IST

कळवण : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगार उदध्वस्त होणार आहेत. सदर कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, या बंदमुळे कळवण बाजार समितीची सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकळवण : लिलाव बंद असल्यामुळे उलाढाल ठप्प

कळवण : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगार उदध्वस्त होणार आहेत. सदर कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन राज्य सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, या बंदमुळे कळवण बाजार समितीची सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्याने बाजार समितीमध्ये कांदा व धान्याचे लिलाव बंद होते. केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेले बदल व नवीन कायद्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, माथाडी मंडळावर नोंदीत माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व द्यावे यासह विविध मागण्यांसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता.

कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे हा शेतमाल सरकारच्या पणन विभागाने बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांचे नुकसान होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात भिला काकुलते, गोरख, देवरे, योगेश पवार, सूरज पगार, ललित काकुलते, गिरीश पवार, लखन, कदम, नंदू आहेर, कडू, देवरे, दिलीप जाधव, मनोज आहेर, शशी पवार,योगेश बागुल, दीपक केदारे, रावसाहेब आहेर, संजय पवार, केवळ निकम, राकेश काकुलते, श्रीराम जाधव, प्रकाश रौदल, विजू देवरे, सोनू पगार, सोनू जाधव यांसह माथाडी कामगार सहभागी झाले होते. 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप