शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

कडक निर्बंध आनंदातून नव्हे कर्तव्य भावनेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याबाबत भुजबळ यांनी आपली भावना जनतेसाठी व्यक्त केली. ते म्हणाले, ...

नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याबाबत भुजबळ यांनी आपली भावना जनतेसाठी व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करूनही फक्त दहा ते बारा हजार रुग्ण संख्या कमी होऊ शकली आहे. मात्र, दररोज तीन ते चार हजार रुग्ण वाढतच असून, रुग्णालयात बेड नाही, ऑक्सिजनची कमतरता यासारख्या प्रश्नांशीही सामना करावा लागत आहे. त्यावरही उपाययोजना केल्या जात असताना रुग्ण कमी होण्याची शक्यता दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील मंत्री, विधानसभा अध्यक्ष व सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येऊन त्यात देखील सर्वांनीच कडक निर्बंध लादण्याबाबतचे मत प्रदर्शित केले आहे. ते पाहता, काही प्रमाणात शेतकरी, दूध व्यावसायिक, किराणा माल विक्रेत्यांचे नुकसान होईल. परंतु आजूबाजूला मृत्यू थैमान घालत असताना ते रोखण्यासाठी अशा प्रकारची पावले उचलणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला याबाबत सहकार्य करावे व कोरोना रोखण्याच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे.