शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

बळे बळे काँग्रेसचे स्वबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांचा तसा हा पहिलाच दौरा होता व या पहिल्या वहिल्या दौऱ्यालाच नाशिकमध्ये ...

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांचा तसा हा पहिलाच दौरा होता व या पहिल्या वहिल्या दौऱ्यालाच नाशिकमध्ये दृष्ट लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होणे स्वाभाविक असले तरी, नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसची परिस्थिती नेमकी काय आहे हे अवगत होण्यापासून पटोले देखील दुरावले आहेत. एकेकाळी केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने नाशिक जिल्हा परिषद व महापालिकेची सत्ता स्वबळावर उपभोगली. सर्वत्र पक्षाचा बोलबाला असतांना राज्याचे नेतृत्व करू शकणारे नेतेही जिल्ह्याने घडविले. त्यामुळे नाशिक जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला व पक्षात नाशिकच्या नेतृत्वाला मानही दिला गेला. परंतु सत्तेबरोबर येणारी सूज अधिक प्रभावी ठरली व काँग्रेसला अवकळा प्राप्त झाली. त्यामुळेच की काय गेल्या दोन वर्षांपासून शहर काँग्रेसला कायमस्वरूपी ना शहराध्यक्ष मिळू शकला ना ग्रामीण महिला काँग्रेसला जिल्हाध्यक्षाच्या रूपाने नेतृत्व.

नाशिक जिल्हा काँग्रेसची सध्याची परिस्थिती खरोखरच स्वबळ अजमाविणारी आहे काय याचा विचार करायचा झाल्यास पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीचा करता येईल. जिल्हा परिषदेच्या ७३ जागांपैकी आठ जागा निवडून आल्या व साडेचार वर्षांच्या काळात त्यातील निम्मे सदस्य पक्ष सोडून गेले आहेत. पंधरा पंचायत समितींपैकी एकाही समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले नाही. तर नाशिक महापालिकेत बोटावर मोजण्याइतपत सहा सदस्य सध्या कार्यरत आहेत. सात नगरपंचायती व आठ नगरपालिकांचा विचार करायचा झाल्यास काँग्रेसचे सदस्य शोधण्याची वेळ आली आहे. अर्थातच पक्षाची ही सारी परिस्थिती निवडणुका स्वबळावर लढविल्यावरच समोर आली होती. पक्ष संघटनेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पाच वर्षांच्या काळात फक्त जिल्हाध्यक्षपदाची खांदेपालट झाली हाच काय तो बदल. मात्र, नवीन जिल्हाध्यक्षांना अद्यापही जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यास मुहूर्त मिळू शकलेला नाही. ओबीसी, आदिवासी, शिक्षक, डॉक्टर अशा विविध संघटनात्मक आघाड्यांची निर्मितीही होऊ शकलेली नाही. अशा साऱ्या नसलेल्या फौजफाट्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करीत असेल तर त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमी आहेच. कदाचित गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून एकाच जागेवर विजय व अन्य चार जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्यामुळे पक्षाची ताकद वाढल्याचा साक्षात्कार स्थानिक नेतृत्वाला झाला असावा व त्यातूनच स्थानिक पातळीवर काँग्रेसची असलेली परिस्थिती पाहून पटोले यांना दौरा करण्याची गरज भासली नसावी असा अर्थ त्यातून काढला तर गैर होणार नाही.