शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

बळे बळे काँग्रेसचे स्वबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांचा तसा हा पहिलाच दौरा होता व या पहिल्या वहिल्या दौऱ्यालाच नाशिकमध्ये ...

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांचा तसा हा पहिलाच दौरा होता व या पहिल्या वहिल्या दौऱ्यालाच नाशिकमध्ये दृष्ट लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होणे स्वाभाविक असले तरी, नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसची परिस्थिती नेमकी काय आहे हे अवगत होण्यापासून पटोले देखील दुरावले आहेत. एकेकाळी केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने नाशिक जिल्हा परिषद व महापालिकेची सत्ता स्वबळावर उपभोगली. सर्वत्र पक्षाचा बोलबाला असतांना राज्याचे नेतृत्व करू शकणारे नेतेही जिल्ह्याने घडविले. त्यामुळे नाशिक जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला व पक्षात नाशिकच्या नेतृत्वाला मानही दिला गेला. परंतु सत्तेबरोबर येणारी सूज अधिक प्रभावी ठरली व काँग्रेसला अवकळा प्राप्त झाली. त्यामुळेच की काय गेल्या दोन वर्षांपासून शहर काँग्रेसला कायमस्वरूपी ना शहराध्यक्ष मिळू शकला ना ग्रामीण महिला काँग्रेसला जिल्हाध्यक्षाच्या रूपाने नेतृत्व.

नाशिक जिल्हा काँग्रेसची सध्याची परिस्थिती खरोखरच स्वबळ अजमाविणारी आहे काय याचा विचार करायचा झाल्यास पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीचा करता येईल. जिल्हा परिषदेच्या ७३ जागांपैकी आठ जागा निवडून आल्या व साडेचार वर्षांच्या काळात त्यातील निम्मे सदस्य पक्ष सोडून गेले आहेत. पंधरा पंचायत समितींपैकी एकाही समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले नाही. तर नाशिक महापालिकेत बोटावर मोजण्याइतपत सहा सदस्य सध्या कार्यरत आहेत. सात नगरपंचायती व आठ नगरपालिकांचा विचार करायचा झाल्यास काँग्रेसचे सदस्य शोधण्याची वेळ आली आहे. अर्थातच पक्षाची ही सारी परिस्थिती निवडणुका स्वबळावर लढविल्यावरच समोर आली होती. पक्ष संघटनेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पाच वर्षांच्या काळात फक्त जिल्हाध्यक्षपदाची खांदेपालट झाली हाच काय तो बदल. मात्र, नवीन जिल्हाध्यक्षांना अद्यापही जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यास मुहूर्त मिळू शकलेला नाही. ओबीसी, आदिवासी, शिक्षक, डॉक्टर अशा विविध संघटनात्मक आघाड्यांची निर्मितीही होऊ शकलेली नाही. अशा साऱ्या नसलेल्या फौजफाट्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करीत असेल तर त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमी आहेच. कदाचित गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून एकाच जागेवर विजय व अन्य चार जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्यामुळे पक्षाची ताकद वाढल्याचा साक्षात्कार स्थानिक नेतृत्वाला झाला असावा व त्यातूनच स्थानिक पातळीवर काँग्रेसची असलेली परिस्थिती पाहून पटोले यांना दौरा करण्याची गरज भासली नसावी असा अर्थ त्यातून काढला तर गैर होणार नाही.