शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घोटी करांनी अनुभवला नारदभेटीचा प्रसंग

By admin | Updated: November 27, 2015 22:58 IST

गिरीबापू यांचे शिवपुराण : नवरात्रानंतर रंगला दांडिया

घोटी : येथे आयोजित श्री शिवपुराण ज्ञानयज्ञात आज दुसऱ्या दिवशी शंकर, विष्णू, ब्रह्मा यांच्या नारदभेटीचा प्रसंग सादर केला. गिरी बापू यांच्या सुमधुर वाणीने व कथेने श्रोते मंत्रमुग्ध झाले. संपूर्ण मंडप या कथेच्या श्रवणात तल्लीन झाला होता.नारद यांना देवर्षी अशी संज्ञा असून, ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. अभिमान हा वाईट असून, त्याचे दुष्परिणाम वाईटच होतात. एके दिवशी देवर्षी नारद एका नगरातून जात असतात. तेव्हा ते नगरातील लोकांना मी किती मोठा आहे हे सांगत असतात. नगरातील लोक मात्र त्यांना सांगतात, आपला चेहरा बघा आधी, तो मर्कटासारखा आहे. हे ऐकून एका जलाशयात स्वत:चे प्रतिंबिब बघून नारदांना आश्चर्य वाटते. अभिमानामुळे स्वत:चा चेहरा विद्रूप झाला असल्याचे त्यांना उमगते. ते तसेच शंकरजींना जाऊन भेटतात. शंकरजी विष्णूंकडे पाठवतात. तेव्हा भगवान विष्णू त्यांना चार पर्याय देतात. प्रथम तिलक, दुसरा रुद्राक्ष, तिसरा ओम नमो शिवायचा जाप आणि चौथा व मुख्य शिवकथा श्रवण. या शिवकथेचे कथन कोण करणार असा प्रश्न नारदांनी विचारला असता, आपले पिता ब्रह्माकडून कथा श्रवण करावयास सांगतात. नारद वडिलांकडे गेले. ब्रह्मांनी नारद यांना शिवकथा सांगावयास सुरुवात केली. हा प्रसंग गिरी बापूंनी आपल्या मधुरवाणीने असा प्रकट केला की, श्रोते मंत्रमुग्ध झाले.शंकर, विष्णू, ब्रह्मा यांना नारदभेटीचे प्रसंग गिरीबापू यांनी हिंदी आणि गुजराथी भाषेतून ऐकविला. सायंकाळी दांडिया रास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नाशिक येथून काही मंडळ दाखल झाले होते. (वार्ताहर)