शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

येवल्यातील उपोषणाची सांगता

By admin | Updated: March 3, 2017 01:18 IST

येवला: पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेले उपोषण सहायक अभियंता व्ही. एस. भागवत यांनी पुढील पाच दिवसांसाठी पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

 येवला: पालखेड पाटबंधारे विभागाच्या डावा कालवा वितरिका क्रमांक ३६ वरील पाणी वापर सहकारी संस्थांना त्यांच्या हक्काचे ४० टक्के पाणी मिळावे यासाठी पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून येथील पालखेड कार्यालयासमोर सुरु केलेले आमरण उपोषण बुधवारी रोजी सहायक अभियंता व्ही. एस. भागवत यांनी पुढील पाच दिवसांसाठी पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. या प्रकरणी शिवसेनानेते संभाजीराजे पवार, मविप्र चे संचालक अंबादास बनकर, भाजपाचे शहर अध्यक्ष आनंद शिंदे, तालुका अध्यक्ष राजूसिंग परदेशी यांनी शिष्टाई केली.शेतकऱ्यांच्या भावना पाहुन येथील अंबादास बनकर, पंचायत समीतीचे माजी सभापती संभाजीराजे पवार, आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचे स्वीय सहायक बी. आर. लोंढे, कोमल वर्दे, अंगणगावचे सरपंच विठ्ठलराव आठशेरे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती अरुण काळे, पारेगावचे माजी सरपंच रवि काळे यांनी मध्यस्थी करून अधिकारी व उपोषणकर्ते यांच्यात समन्वय साधला. शेतकऱ्यांच्या भावना अधिकाऱ्यांना सांगून पाच दिवसांसाठी वितरिका क्रमांक ३६ ला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले.बुधवारी दुपारी ३ वाजेपासून पालखेड अधिकारी उपोषणकर्त्यांची समजूत घालत होते. मात्र शेतकरी व संस्थांचे पदाधिकारी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर भाऊसाहेब कांबरे, शामराव मढवई, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, चंद्रकांत मोरे, किसन मढवई, दिगंबर आव्हाड, दिगंबर गायकवाड, अंगणगावचे सरपंच विठ्ठलराव आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सुर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्री मढवई आदिंसह पाणीवार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरु केले होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभिंयता राजेश गोवर्धने, उपविभागीय अभियंता आर. के. दिंडे, शाखा अभियंता जी. आर. काकुळते उपस्थित होते. (वार्ताहर)