शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:58 IST

नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपिंपळद येथेही वीज कोसळून दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.

नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथे मुले क्रिकेट खेळत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी तीन युवक कडुलिंबाच्या झाडाखाली आडोशाला लपले असता अंगावर वीज पडून तिघेही ठार झाल्याची घटना घडली.घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मानोरी गावावर शोककळा पसरली.चाळिशी गाठल्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांचाही या पावसामुळे हिरमोड झाला. गेल्या तीन दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला असून, कडक ऊन पडून नागरिक घामाघूम होत असताना रात्री थंड वारे वाहू लागले. त्यातच अधूनमधून आकाशात ढग गर्दी करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी चांदवड, येवला व सिन्नर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर वादळाने अनेक घरांचे नुकसान केले. बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला असताना रविवारी दुपारनंतर अचानक पुन्हा आकाशात ढगांची गर्दी होऊन हवा बंद झाली. सायंकाळी पाच वाजेनंतर सोसाट्याचा वारा सुटला व विजेचा कडकडाट करीत पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकसह चांदवड, दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे यमुनाबाई भाऊसाहेब गुंजाळ यांच्या शेतात वीज पडून गाय मरण पावली. नाशिक तालुक्यातील पिंपळद येथेही वीज कोसळून दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.