शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:58 IST

नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपिंपळद येथेही वीज कोसळून दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.

नाशिक : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने तिघा विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहे. दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील तीन मुले वीज पडून ठार झाली. वीज पडल्याने दिंडोरी तालुक्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतात सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे व रोहित हिरामण गायकवाड यांचा समावेश आहे. अन्य घटनेत महिलेचा मृत्यू झाला. वीज पडून चांदवङ तालुक्यातील खडकओझर येथील जनाबाई सुभाष गिरी (४०) या महिलेचा मृत्यू झाला.दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथे मुले क्रिकेट खेळत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी तीन युवक कडुलिंबाच्या झाडाखाली आडोशाला लपले असता अंगावर वीज पडून तिघेही ठार झाल्याची घटना घडली.घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मानोरी गावावर शोककळा पसरली.चाळिशी गाठल्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांचाही या पावसामुळे हिरमोड झाला. गेल्या तीन दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला असून, कडक ऊन पडून नागरिक घामाघूम होत असताना रात्री थंड वारे वाहू लागले. त्यातच अधूनमधून आकाशात ढग गर्दी करू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी चांदवड, येवला व सिन्नर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर वादळाने अनेक घरांचे नुकसान केले. बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला असताना रविवारी दुपारनंतर अचानक पुन्हा आकाशात ढगांची गर्दी होऊन हवा बंद झाली. सायंकाळी पाच वाजेनंतर सोसाट्याचा वारा सुटला व विजेचा कडकडाट करीत पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकसह चांदवड, दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे यमुनाबाई भाऊसाहेब गुंजाळ यांच्या शेतात वीज पडून गाय मरण पावली. नाशिक तालुक्यातील पिंपळद येथेही वीज कोसळून दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.