शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

साठवण तलाव कोरडाठाक

By admin | Updated: March 20, 2016 22:37 IST

येवला : ४६ गावांना करावी लागणार भटकंती

 येवला : तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात केवळ एक दलघफू पाणी शिल्लक असल्याने ४६गावांना एकदाच पाणीपुरवठा केल्यानंतर, हा साठवण तलाव कोरडाठाक होऊन नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येवला तालुक्यातील ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना एप्रिल २०१२ पासून सुरळीत सुरू आहे. या योजनेतील साठवण तलावाची क्षमता ४० दलघफू आहे. जानेवारी महिन्यात मिळालेल्या आवर्तनात पालखेडच्या ढिसाळ नियोजनामुळे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात केवळ ७ दलघफू मिळाले. तसेच पूर्वीचे शिल्लक ६ दलघफू पाणी मिळून १३ दलघफू पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु गेले ५५ दिवस पाणीपुरवठा होऊन आता केवळ एक दलघफू पाणी शिल्लक आहे. काही दिवसांपासून या योजनेद्वारे ग्रामस्थांना १० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु आता २२ व २३ मार्च रोजी पाणीपुरवठा केल्यास तलाव कोरडाठाक पडणार असल्याचे चित्र आहे. या योजनेमुळे अनेक वर्षांपासून ४६ गावांना टँकर मुक्त केले आहे. टँकरवर होणारा लाखो रु पयांचा खर्च व नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती या योजनेमुळे थांबली; मात्र आता जर या योजनेला वेळच्या वेळी आवर्तनाद्वारे पाण्याचा पुरवठा झाला नाही, तर योजनेचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. सचिन कळमकर यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. परंतु आवर्तन दिल्यास ते पाणी १५ जुलैअखेर पुरवावे असे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)