शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

चांदवडला कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

By admin | Updated: December 4, 2015 21:42 IST

भावात घसरण : तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

चांदवड : कांद्याला प्रतिक्विंटल ७०० रुपये असा अल्पभाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. या यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे दोन तासांनंतर बाजार समितीतील व्यवहारही सुरळीत झाले.माजी आमदार शिरीष कोतवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, अ‍ॅड. नवनाथ अहेर, बाळासाहेब वाघ, आर. बी. वाघ, प्रवीण हेडा आदिंसह अनेक व शेतकरी उपस्थित होते. याबाबत शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारला घटनेची माहिती पोहचू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले तर शिरीष कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी रास्ता रोको आंदोलनामुळे अनेक रुग्ण व प्रवासी यांना वेठीस धरू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केल्याने रास्ता रोको मागे घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये सभा घेण्याचे ठरले.रास्ता रोकोनंतर लगेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये व्यापारी, शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, संचालक व माजी आमदार शिरीष कोतवाल, संजय जाधव, बाळासाहेब वाघ, सचिव आर.बी. वाघ, व्यापारी प्रवीण हेडा, पारस डुंगरवाल, सुशील पलोड, पप्पूशेठ हेडा, अविनाश व्यवहारे, अग्रवाल यांच्या उपस्थित अनेक समस्यांवर चर्चा झाली.यावेळी मात्र संतप्त शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या तर शेतकऱ्यांचा शेतीमाल फाळके पाडून बघू घेतल्यानंतरही व्यापारी वांदे काढतात यावर चर्चा झाली तर बाजारभावामध्ये इतर कृउबाच्या तुलनेत फरक पडतो, असा आरोप करण्यात आला.तर यावरून माजी आमदार कोतवाल व सभापती डॉ. कुंभार्डे यांच्यामध्ये भ्रमणध्वनीवर बाजारभाव टाकले जातात व त्यात इतर बाजार समितीच्या तुलनेत फरक असतो यावरून शाब्दिक चकमकही उडाली तर येत्या आठ दिवसात कांद्याला योग्य भाव न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कोतवाल यांनी दिला तर सभापती डॉ.कुंभार्डे यांनी जिल्हाधिकारी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना कांदा बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी किमान निर्यातमूल्य कमी करण्याचे निवेदन दिले असल्याचे डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)