शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

‘आत्महत्त्या थांबवा; शेतकरी जगवा’

By admin | Updated: September 24, 2016 23:07 IST

पाणावले डोळे : आधारतीर्थ आश्रमकन्या जना, आकांक्षा यांचे भावनिक आवाहन

नाशिक : ‘महाराष्ट्रात मराठ्यांवर अन्याय होणार नाही, शेतकरी आत्महत्त्या करणार नाही अशी तजवीज सरकारने करावी या मागणीसह एकवटलेल्या लाखो मराठ्यांनो, तुम्ही शेतकऱ्यांना जगवा तरच महाराष्ट्र अन् देश जगेल, असे भावनिक आवाहन आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील मुलांचे आधारतीर्थ आश्रमाची कन्या जना कृष्णा चौधरी हिने कान्हेरे मैदानावरून केले. ‘माझे आई-बाबांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली; मात्र यापुढे महाराष्ट्रात कुठलाही शेतकरी कर्जबाजारी होऊन गळफास लावणार नाही, याची दक्षता आम्हा मराठ्यांनाच घ्यावी लागेल’ असे चौधरी हिने आपल्या मनोगतातून सांगितले. महाराष्ट्रात झालेल्या आत्महत्त्या रोखणे गरजेचे असून, आधारतीर्थ आश्रमाची गरज यापुढे भासणार नाही, याची काळजी मराठा समाजाने घ्यावी आणि सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे,  अशी मागणी आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील चौधरी हिने मोर्चाच्या समारोपप्रसंगी उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने केली. मनोगत व्यक्त करताना ती भावनिक झाली आणि अश्रू अनावर होऊ लागल्याने चौधरीने पुन्हा त्याच आत्मविश्वासाने आणि  उत्साहाने शिवबा व जिजाऊचा जयजयकार करत शब्दांना विराम दिला. यावेळी उपस्थित लाखो समाजबांधवांचेही डोळे पाणावले होते. (प्रतिनिधी)आकांक्षाच्या गीताने अश्रू अनावरत्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमातील आश्रमकन्या आकांक्षा दिनेश पवार हिने आपल्या मनातील व्यथा एका गीतातून मांडण्याचा प्रयत्न केला. ‘ घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, तुमच्या साथीने आम्ही आहोत ना बाबा, जहर खाऊ नका...’ हे गीत आकांक्षाने सादर करत तिच्यावर फाटलेल्या आभाळामुळे होणाऱ्या वेदना मराठा समाज आणि सरकारपर्यंत पोहोचविल्या. यावेळी उपस्थित लाखोंच्या समुदायामध्ये अनेकांना अश्रू अनावर झाले होते.टाळ्या नव्हे जयघोषमोर्चाच्या समारोपप्रसंगी मराठा समुदायाच्या ११ रणरागिणींनी समाजाच्या व्यथा आणि सरकारची भूमिका पुरेपूरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्येकीचे मनोगत संपल्यानंतर उपस्थित लाखोंच्या समुदायापैकी एकानेही टाळी वाजविली नाही. प्रत्येकाच्याच मनात आत्मक्लेशाची जाणीव होती आणि त्यामुळेच टाळ्या न वाजवता समाजबांधवांनी शिवरायांचा जयघोष करीत रणरागिणी युवतींचा आत्मविश्वास वाढविला.