शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पिंपळगाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:16 IST

सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठेकेदाराने तत्काळ काम मार्गी लावण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसंताप : सुरत-शिर्डी महामार्गाचे काम संथ गतीने; धुळीचे साम्राज्याने आरोग्य धोक्यात

पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठेकेदाराने तत्काळ काम मार्गी लावण्याची मागणी केली.या रस्त्याच्या कामामुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना समोरून येणारे वाहन दिसत नाहीत. अनेकवेळा रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी केली असता याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धुळीचे साम्राज्य व कामामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे, या सर्व हानीला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांसह प्रवाशांनी उपस्थित केला आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी मोऱ्या अथवा पुलाचे काम केले आहे. त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे.मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. धुळीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारास काम काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

अगोदरच अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यातच थंडीनेदेखील उपद्रव होत असतानाच, आता धुळीचा त्रास वाढल्याने पिकांसह शेतकऱ्यांनाही धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम कधी मार्गी लागेल याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया उद्धवराजे शिंदे, माणिक शिंदे, स्नेहा गायकवाड व आंदोलकांनी यावेळी दिली.श्वसनाची क्षमता होतेय कमीरस्त्याच्या कामामुळे उडणारी धूळ श्वासातून शरीरात जाते. त्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुप्फुसात, श्वसननलिकेत जातात. अ‍ॅलर्जीचा त्रास असणाºयांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घसा दुखीचे आजार जडले आहेत, तर अनेकांची श्वसन क्षमता कमी होत असल्याने रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याचीअपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Strikeसंप