शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

नांदगावी रास्ता रोको

By admin | Updated: November 17, 2016 23:59 IST

संताप : भाजीपाला लिलावावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

नांदगाव : भाजीपाला लिलाव गुरुवारी सकाळी बंद पडून रास्ता रोको करण्यात आला. तीन दिवस बाजार बंद होता. बंदची नोटीस नाही व सुरू करण्याची माहिती नाही. यामुळे विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी जैन धर्मशाळेजवळ पुलावर रास्ता रोको केला. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे व पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व्यवहार सुरू झाले. देवगुणे यांनी बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी व अडते यांची बैठक शुक्रवारी (दि. १८) बोलावून सर्वांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.येथे पाच आडते असून, दररोज ५० हजारांपेक्षा अधिक उलाढाल होत असते. शेतकरी वर्गाकडून शून्य टक्के आडत व व्यापारी वर्गाकडून सात टक्के आडत घेण्याचा नियम असतानाही मनमानी करून अधिक रकमेची आडत घेतली जाते असा आक्षेप आहे. तसेच आडते व बाजार समिती यांच्यात पावती फाडण्यावरून वाद आहेत. दरम्यान, गेले आठ दिवस ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या वादावरून बंद असलेली बाजार समिती आज व्यापारी, शेतकरी व संचालक यांच्या बैठकीनंतर सुरू करण्याचे निश्चित झाले.खरेदीची रक्कम शंभर टक्के चेकने द्यावयाची, रोखीने व्यवहार करायचा नाही. चेक जर वटला नाही तर त्याच दिवशी धनादेशाची रक्कम रोखीने अदा करायची. असे न करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना बाजार समिती रद्द करेल.ज्या व्यापाऱ्याकडे धनादेश नसेल त्याला लिलावात भाग घेता येणार नाही. शेतकऱ्याने लिलावात माल आणताना पासबुकची झेरॉक्स घेऊनच यायची जेणेकरून चेकवर अचूक नाव लिहिले जाईल. बैठकीस सभापती तेज कवडे, उपसभापती भाऊसाहेब सदगीर, भाऊसाहेब काकळीज, दिवटे, राजेंद्र देशमुख, व्यापारी सचिन पारख, संजय करवा, सोमनाथ घोंगाणे, समीर कासलीवाल, वाल्मीक गायके, चंद्रकांत फोफलिया, आनंद चोरडिया, सचिन फोफलिया, गोकुळ खैरनार उपस्थित होते.मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांकडून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात जास्तीचा भाव देण्याचे आमिष दाखवून खरेदी करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. तसेच बाजार समिती बंद असण्याच्या कालावधीत अशा प्रकारे खरेदी केल्याचे समजते. सर्व रकमा धनादेशाने अदा करावयाच्या निर्णयामुळे सदर प्रकारास आळा बसेल असे समजण्यात येत आहे. (वार्ताहर)