शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

नांदगावी रास्ता रोको

By admin | Updated: November 17, 2016 23:59 IST

संताप : भाजीपाला लिलावावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

नांदगाव : भाजीपाला लिलाव गुरुवारी सकाळी बंद पडून रास्ता रोको करण्यात आला. तीन दिवस बाजार बंद होता. बंदची नोटीस नाही व सुरू करण्याची माहिती नाही. यामुळे विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी जैन धर्मशाळेजवळ पुलावर रास्ता रोको केला. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे व पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व्यवहार सुरू झाले. देवगुणे यांनी बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी व अडते यांची बैठक शुक्रवारी (दि. १८) बोलावून सर्वांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.येथे पाच आडते असून, दररोज ५० हजारांपेक्षा अधिक उलाढाल होत असते. शेतकरी वर्गाकडून शून्य टक्के आडत व व्यापारी वर्गाकडून सात टक्के आडत घेण्याचा नियम असतानाही मनमानी करून अधिक रकमेची आडत घेतली जाते असा आक्षेप आहे. तसेच आडते व बाजार समिती यांच्यात पावती फाडण्यावरून वाद आहेत. दरम्यान, गेले आठ दिवस ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या वादावरून बंद असलेली बाजार समिती आज व्यापारी, शेतकरी व संचालक यांच्या बैठकीनंतर सुरू करण्याचे निश्चित झाले.खरेदीची रक्कम शंभर टक्के चेकने द्यावयाची, रोखीने व्यवहार करायचा नाही. चेक जर वटला नाही तर त्याच दिवशी धनादेशाची रक्कम रोखीने अदा करायची. असे न करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना बाजार समिती रद्द करेल.ज्या व्यापाऱ्याकडे धनादेश नसेल त्याला लिलावात भाग घेता येणार नाही. शेतकऱ्याने लिलावात माल आणताना पासबुकची झेरॉक्स घेऊनच यायची जेणेकरून चेकवर अचूक नाव लिहिले जाईल. बैठकीस सभापती तेज कवडे, उपसभापती भाऊसाहेब सदगीर, भाऊसाहेब काकळीज, दिवटे, राजेंद्र देशमुख, व्यापारी सचिन पारख, संजय करवा, सोमनाथ घोंगाणे, समीर कासलीवाल, वाल्मीक गायके, चंद्रकांत फोफलिया, आनंद चोरडिया, सचिन फोफलिया, गोकुळ खैरनार उपस्थित होते.मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांकडून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात जास्तीचा भाव देण्याचे आमिष दाखवून खरेदी करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. तसेच बाजार समिती बंद असण्याच्या कालावधीत अशा प्रकारे खरेदी केल्याचे समजते. सर्व रकमा धनादेशाने अदा करावयाच्या निर्णयामुळे सदर प्रकारास आळा बसेल असे समजण्यात येत आहे. (वार्ताहर)