शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

By admin | Updated: December 7, 2015 23:12 IST

शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

न्यायडोंगरी : नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ७) न्यायडोंगरी येथील सावरगाव चौफुली (नाना चौक), राज्य क्र मांक २४ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने काहीकाळ संपूर्ण वाहतूक खोळंबून दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुधाला रास्त भाव मिळावा, गुरांचे खाद्य असलेल्या सरकी पेंडीचे साठेबाजी बंद करावी, कांद्याचे निर्यातशुल्क शून्य करण्यात यावे, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, माणिकपुंज धरणातील पाणी नदीपात्र व पाटाद्वारे सोडून शेतकऱ्यांना व पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केले. सोमवार न्यायडोंगरी येथील आठवडे बाजाराचा दिवस असल्याने याप्रसंगी प्रचंड गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदगावचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह प्रचंड फौजफाटा तैनात असल्याने आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार वाघ व पोलीस निरीक्षक ठोंबे यांना लेखी निवेदन देण्यात आलेया आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निवृत्ती खालकर, अशोक जाधव, तेजस बोरसे, दत्तात्रय जाधव, विलास घोटेकर, सुरेश जाधव, किरण लगडे, बालाजी निस्ताने, तुकाराम निस्ताने, दीपक शेलार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे एक तास चालू असलेल्या या आंदोलनामुळे खोळंबलेली वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी व वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)

मनमाड :  कांद्याला सरासरी ११५0 रुपये भावमनमाड : कांदाभावात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठशे ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. बाजार समितीमध्ये  कांद्याला किमान ७00 व  कमाल १५00 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी ११५0 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. या वर्षी पावसाने  दगा दिल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर झाला आहे. एकरी उत्पादन घटल्याने बाजारभाव वाढल्यानंतरही शेतकर्‍याचे आर्थिक नियोजन कोलमडले होते. सध्या झालेल्या बाजारभावातील घसरणीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कांद्याबरोबरच भाजीपाल्याच्या उत्पादनातही घट झाली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे थोड्याफार प्रमाणात पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.