शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

By admin | Updated: December 7, 2015 23:12 IST

शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

न्यायडोंगरी : नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ७) न्यायडोंगरी येथील सावरगाव चौफुली (नाना चौक), राज्य क्र मांक २४ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने काहीकाळ संपूर्ण वाहतूक खोळंबून दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुधाला रास्त भाव मिळावा, गुरांचे खाद्य असलेल्या सरकी पेंडीचे साठेबाजी बंद करावी, कांद्याचे निर्यातशुल्क शून्य करण्यात यावे, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, माणिकपुंज धरणातील पाणी नदीपात्र व पाटाद्वारे सोडून शेतकऱ्यांना व पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी नांदगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केले. सोमवार न्यायडोंगरी येथील आठवडे बाजाराचा दिवस असल्याने याप्रसंगी प्रचंड गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदगावचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह प्रचंड फौजफाटा तैनात असल्याने आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार वाघ व पोलीस निरीक्षक ठोंबे यांना लेखी निवेदन देण्यात आलेया आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निवृत्ती खालकर, अशोक जाधव, तेजस बोरसे, दत्तात्रय जाधव, विलास घोटेकर, सुरेश जाधव, किरण लगडे, बालाजी निस्ताने, तुकाराम निस्ताने, दीपक शेलार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे एक तास चालू असलेल्या या आंदोलनामुळे खोळंबलेली वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी व वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)

मनमाड :  कांद्याला सरासरी ११५0 रुपये भावमनमाड : कांदाभावात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आठशे ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. बाजार समितीमध्ये  कांद्याला किमान ७00 व  कमाल १५00 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी ११५0 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. या वर्षी पावसाने  दगा दिल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर झाला आहे. एकरी उत्पादन घटल्याने बाजारभाव वाढल्यानंतरही शेतकर्‍याचे आर्थिक नियोजन कोलमडले होते. सध्या झालेल्या बाजारभावातील घसरणीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कांद्याबरोबरच भाजीपाल्याच्या उत्पादनातही घट झाली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे थोड्याफार प्रमाणात पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.