शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांचा रास्ता रोको वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:55 IST

इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : कचºयाबरोबरच पुठ्ठे, लोखंड, प्लॅस्टिक आदी स्वरूपात नागरिकांनी दिलेल्या भंगारची विक्री करण्यासाठी समांतर रस्त्यालगतच तासन्तास उभ्या राहणाºया घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सुमारे दहा वर्षांपूर्वी महामार्गास दोन्ही बाजूस समांतर रस्ते तयार करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीस रस्ता मोकळा होईल, असे वाटत होते. परंतु समांतर रस्त्यालगतच असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांमुळे वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होत आहे. समांतर रस्त्यालगतच दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. या उपनगरांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, परंतु याच समांतर रस्त्यावरून शहरातील विविध प्रभागांतून केरकचरा गोळा करून घंटागाड्या खतप्रकल्प जातात. त्यावेळी घंटागाड्यात गोळा झालेला भंगारमाल विक्र ीसाठी समांतर रस्त्यावरच भगतसिंग वसाहतीत असलेल्या भंगार विक्र ीच्या दुकानात विकतात. त्यासाठी तासन्तास घंटागाड्या उभ्या राहतात. मार्गक्रमण करणाºया वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, त्यामुळे लहान-मोठे अपघातही घडत आहेत. महापालिका अतिक्र मण विभागाने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम उभारली आहे, परंतु त्यांना समांतर रस्त्यावरील भंगार विक्रीची दुकाने दिसत नाही का असा उपरोधक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.