शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड, नामपूरला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:23 IST

कांदा भावात घसरण : शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, शेतकरी व व्यापाºयांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दोन तास रास्ता रोको केला.

नामपूर येथे रास्ता रोकोनंतर शेतकºयांशी संवाद साधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक खैरनार.

कांदा भावात घसरण :  शेतकरी संतप्त; लिलाव पाडले बंद

नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाºयाच्या साठवलेल्या मालावर अचानक प्राप्तिकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले असून, शेतकरी व व्यापाºयांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दोन तास रास्ता रोको केला.यंदा मोसम खोºयात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. गत महिनाभरापासून कांद्याला चांगला भाव मिळत होता; मात्र शहरी भागात ग्राहकाला महागडा कांदा खरेदी करावा लागत असल्यामुळे शेतकºयाकडून कांदा खरेदी करून साठेबाजी करणाºया व्यापाºयाच्या शेडवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाºयांनी अचानक धाडी टाकल्या. यात नामपूर येथील एका व्यापाºयाच्या शेडवर या पथकाने तपासणी करून कार्यवाही केल्यामुळे नामपूरच्या सर्व व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद पाडले. यात कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे संतप्त झाले. त्यांनी मार्केटच्या गेटसमोर सुमारे दोन तास रास्ता रोको केला. नामपूर बाजार समितीत दुपारी४ वाजता लिलाव सुरूकरण्यात आले; मात्र बाजारभाव सरासरी एक हजारपर्यंत पुकारण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक प्रचंड नाराज झाल्याचे चित्र होते. आर्थिक टंचाई, मजूर टंचाई, पावसाचे वातावरणमुळे नामपूर मार्केट येत्या मंगळवारपर्यंत बंदठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सचिव संतोष गायकवाड यांनी दिली. कांद्यास किमान दोन हजार रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार, काँग्रेसचे प्रवीण सावंत, समीर सावंत, मधुकर कापडणीस यांनी करून भाजपा शासनाचा निषेध केला. या रास्ता रोकोप्रसंगी नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, मंडळ अधिकारी सी.पी. अहिरे, पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देऊन व्यापारी व शेतकºयांच्या अडचणी समजून घेतल्या.चांदवडला संतप्त शेतकºयांचे ठिय्या आंदोलनचांदवड : शहरातील कांदा व्यापाºयावर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी छापे टाकल्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कांदा व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद ठेवले. सकाळपासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० ते ३०० टॅक्टर व पिकअपमधून ग्रामीण भागातील शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. सकाळी १० वाजता लिलावास प्रारंभ होईल या अपेक्षेवर शेतकरी लिलाव सुरू होण्याची वाट पाहत होते. बाजार समितीत जाऊन त्यांनी चौकशी केली असता आता लिलाव सुरू होईल. थोड्या वेळ्याने लिलाव सुरू होईल, अशी उत्तरे मिळाल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले. लिलाव सुरू होत नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.संतप्त शेतकºयांचा ताफा मुंबई आग्रारोडकडे रास्ता रोको करण्यास निघाला. घटनेचे वृत्त वाºयासारखे समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी हे पेट्रोलपंप चौफुलीवर आले. त्यांनी संतप्त शेतकºयांना शांत करून आपण लगेच बाजार समितीत जाऊन लिलाव सुरू करण्यास सांगू, असे सांगून सर्वच शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले. संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी आम्ही सकाळपासून आलो मात्र आमचे कांदा लिलाव होत नाही, यावर नाराजी व्यक्त करीत बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, संचालक विलास ढोमसे, निवृत्ती घुले, संजय जाधव, चंद्रकांत व्यवहारे, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, युवानेते राहुल कोतवाल, समाधान जामदार यांच्यासमवेत व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक सभागृहात झाली. यावेळी व्यापाºयांनी आयकर विभागाच्या धाडीबरोबरच आम्हाला अवघा ५०० क्विंटल कांदा स्टॉक करण्याची परवानगी असताना आम्ही कांदा खरेदी करून अजून कुठे अशा धाडींना सामोरे जाऊ याकरिता आम्ही कांदा लिलाव सुरू करणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र डॉ. कुंभार्डे, नितीन अहेर व संचालकांनी विनंती केली.व्यापाºयांनी आजच्या दिवस तरी शेतकºयांची अडचणी व दूर करून एवढा माल आणल्याने लिलाव करावा असा आग्रह केल्याने त्यांची विनंती मान्य करीत आजचा दिवस लिलाव सुरू केले. मात्र आजचा बाजारभाव ७०० ते ११०० रुपयेपर्यंत राहील व आज व्यापाºयांनी बॅँकेतून पैसे न आणल्याने या मालाचे पैसे २४ तासात देऊ, असे सांगून लिलाव दुपारी ३.३० वाजता सुरू झाले; मात्र उद्यापासून चांदवड बाजार समितीत व्यापाºयांचा बंद असल्याने पुढील निर्णय होईलपर्यंत शेतकºयांनी कांदा आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.