शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त क्रेनचा महामार्गावरच थांबा

By admin | Updated: July 9, 2016 00:49 IST

अपघाताची शक्यता : पोलीस प्रशासनाचा ‘कानाडोळा’

 पंचवटी : रस्त्यावर अपघात झाला तर तत्काळ त्याठिकाणी जाऊन कसा अपघात झाला, कधी झाला याची खातरजमा करत अपघाताला कारणीभूत असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनाही खाकीचा धाक दाखवून वाहनासह संबंधितांना पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात आणतात; मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिराजवळ असलेल्या मुख्य वाहतूक रस्त्यावर बावीस ते चोवीस चाकांचा नादुरुस्त क्रेन आणि तोदेखील भररस्त्यावरच उभा करण्याचा पराक्रम संबंधित क्रेनचालकाने केल्याने वाहतुकीचा खोळंबा तर होतच आहे शिवाय अपघाताचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य मार्गावरच उभ्या असलेल्या या क्रेनकडे ना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे ना वाहतूक शाखेचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बळीमंदिरापासून अवघ्या काही अंतरावर उभ्या असलेल्या नादुरुस्त क्रेनमुळे अपघातांची शक्यता असल्याची तक्रार नागरिकांनी तसेच पिंपळगाव टोलनाक्याने पोलीस प्रशासनाकडे करून क्रेन रस्त्यातून हटवावा, असे पोलिसांना कळविले होते; मात्र पोलिसांनी देखील त्याठिकाणी जाऊन केवळ विचारपूस करून सदर क्रेन नादुरुस्त असल्याने तो रस्त्यात थांबविला आहे तसेच तो हलविता येत नाही, असे संबंधितांकडून सांगण्यात आल्याचे कारण पुढे करून गप्प बसून राहण्याची भूमिका बजावली आहे. (वार्ताहर)