शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोदावरी जलप्रवासाची साक्ष देताहेत दगडी धक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 00:44 IST

शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्यासाठी जलप्रवास हाच पर्याय होता नावेतून प्रवास करण्याच्या अनेक पाऊलखुणा आजही टिकून आहेत. 

ठळक मुद्देदिनविशेष गोदावरी प्रकट दिन २२५ वर्षांपूर्वीच्या खुणा; मनोरे संवर्धन करण्याची जानी यांची मागणी

नाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्यासाठी जलप्रवास हाच पर्याय होता नावेतून प्रवास करण्याच्या अनेक पाऊलखुणा आजही टिकून आहेत. ब्रिटिशांनी बांधलेल्या व्हिक्टोरिया ब्रिजपूर्वी अनेक वर्ष अगोदर म्हणजे सुमारे २२५ वर्षांपूर्वी ही व्यवस्था होती. गोदा जलमार्गातील नाव बांधण्यासाठी त्यावेळी असलेल्या  जुन्या दगडी धक्क्याच्या खुणा आजही उपलब्ध आहेत. त्याबाबत विविध पुस्तकातून त्याची माहिती घेऊन इतिहास अभ्यासक देवांग जानी या खुणा शोधून काढल्या आहेत. नाशिकचा पुरातन इतिहास असलेल्या या दगडी वास्तू जतन करण्याची मागणी जानी यांनी केली आहे. १८९५ पूर्वी पंचवटी ते नाशिक जाण्यायेण्यासाठी एकमेव जलमार्ग होता. त्याकाळी पंचवटीतून नाशिक किंवा नाशिकहून पंचवटीत जाण्यायेण्यासाठी गोदावरी नदीतून नावेद्वारे प्रवास करावा लागत असे. त्यासाठी टाळकुटेश्वर देवळाजवळ नाव उपलब्ध होत असे. तेथून नावेत बसून  लोक जा ये करीत असे. नदीच्या दोन्ही तिराला उंच मनोरे दगडात बांधलेले असत. त्यावर लोखंडी साखळीने नावा बांधीत असत. पंचवटी अमरधामसमोर आणि नाशिक अमरधाम बाहेरील बांधलेले दगडी धक्के अजूनही सुस्थितीत आढळतात. नावेमध्ये प्रवासासाठी व्यक्ती मागे १ आणा दर आकारला जात असे. पावसाळ्यात पाणी कमी झाल्यावर, चांदवडकर यांच्या सांडव्यावर हमाल लोक उभे असत. हमाल लोक मनुष्याला पाठीवर घेऊन पलीकडे पोहचविण्यासाठी मजुरीपोटी एका खेपेस सहा पै घेत असे. n  नदीच्या किनारी असलेल्या धक्क्याच्या ठिकाणी नाव उभ्या केल्या जात असल्याने  या भागाचे नाव नाव दरवाजा असे पडले, अशीही नोंद आढळल्याचे जानी सांगतात. पुढे अनेक वर्षे नौकेद्वारे होणाऱ्या गैरसोयी बघून नाशिक शहराचे तत्कालीन असिस्टंट कलेक्टर व नाशिक नगरपालिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष काशिनाथ महादेव थत्ते यांच्या पुढाकाराने ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया पूल बांधला. पुलाचे उदघाटन तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हेरीस यांनी १४ जानेवारी १८९५ ला केले त्याची साक्ष पुलाखालील तक्ति आजही  देत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी