शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

विद्रोहाच्या स्फुल्लिंगाची अद्यापही उपेक्षाच

By admin | Updated: July 17, 2016 00:56 IST

आज जयंती : प्रख्यात साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या स्मारकाची घोषणा हवेतच

सुदीप गुजराथी नाशिक‘वेदाआधी तू होतास’ असे सांगत आपल्या लेखणीतून विद्रोहाचा अंगार फुलवणारे दिवंगत साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या स्मारकाची उपेक्षा सुरूच आहे. बागुल यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या स्मारकासह अन्य बऱ्याच घोषणा केल्या; मात्र त्यातील एकही घोषणा प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. त्यामुळे या प्रतिभावंत साहित्यिकाला मृत्यूनंतरही त्याच्या मूळगावीच उपेक्षेच्या यातना सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. ‘जेव्हा मी जात चोरली होती’, ‘मरण स्वस्त होत आहे’, ‘सूड’, ‘वेदाआधी तू होतास’ यांसारखे तेजस्वी साहित्य निर्माण करणाऱ्या बाबूराव बागुल यांचे नाशिक येथे २६ मार्च २००८ रोजी निधन झाले. या बुद्धिप्रामाण्यवादी साहित्यिकाचे अवघ्या महाराष्ट्राला स्मरण राहावे, यासाठी त्यांच्या निधनानंतर अनेक घोषणा करण्यात आल्या; मात्र त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. बागुल यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगीच तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सरकार व लोकसहभागातून नाशिकमध्ये बाबूराव बागुल यांचे भव्य स्मारक उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. बागुल यांचे नाशिकजवळच्या विहितगाव येथे निवासस्थान आहे. या घरासमोरच्या मोकळ्या जागेत सहकारी तत्त्वावर चालणारी प्रिंटिंग प्रेस उभारावी, त्यातून दर्जेदार साहित्याची छपाई व्हावी, बेरोजगारांना काम मिळावे, असे बागुल यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने काही राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी हालचालही सुरू केली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सरकारच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र हे काम पुढे सरकू शकले नाही. तत्कालीन महापौर विनायक पांडे यांनी कोलकात्यातील नॅशनल लायब्ररीच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय उभारून त्याला बाबूराव बागुल यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. ते बागुल यांच्यासारख्या विचारवंताला साजेसे स्मारक ठरले असते; मात्र ही घोषणा हवेत विरली.याशिवाय बागुल यांच्या मुलांना महापालिकेत नोकरी देण्याचे, त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्याचे आश्वासनही देण्यात आले, घोषणाही करण्यात आल्या. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान समारंभातही प्रतिष्ठानच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बागुल यांची उपलब्ध नसलेली पुस्तके प्रकाशित करण्याची घोषणा केली होती; मात्र यापैकी एकही काम प्रत्यक्षात अवतरू शकले नाही. गंगाधर अहिरेंसारख्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे महाकवी कालिदास कलामंदिरात त्यांची तसबीर लागू शकली एवढेच. तेवढे वगळल्यास मराठी साहित्याला क्रांतीची, विद्रोहाची बैठक देणाऱ्या या प्रतिभावंत, तेजस्वी साहित्यिक, कवीच्या नावाने मुक्त विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा एकमेव पुरस्कार सोडता नाशकात ना त्यांच्या नावाचा जागर होतो, ना त्यांच्या साहित्याला उजाळा मिळतो.