शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दर्जा खालवला

By admin | Updated: May 16, 2015 01:19 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दर्जा खालवला

  नाशिक : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याच्या तक्रारींचा पाढा खासदारांनी वाचल्यानंतर केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, ए. टी. पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यभरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. एप्रिल २०१५ अखेरपर्यंत नाशिक विभागात मंजूर झालेल्या २५५ कामांपैकी १९४ कामे पूर्ण झाली आहेत, तर ६१ कामे निधीअभावी रखडली आहेत. या कामांसाठी ४१८ कोटी ९१ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात २८५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने त्यातून १९४ कामेच पूर्ण करता आली, तर उर्वरित ६१ कामांसाठी लागणारा ११८ कोटी ९३ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असल्याने विभागातील योजनेअंतर्गत कामे खोळंबली आहेत. दरम्यान, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेकरिता पुरेशा निधीची तरतूद केली नसल्यानेच निधीची चणचण भासत असल्याची कबुलीही भगत यांनी दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांनी पेठ, सुरगाणा या भागात या योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली.