शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दर्जा खालवला

By admin | Updated: May 16, 2015 01:19 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा दर्जा खालवला

  नाशिक : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याच्या तक्रारींचा पाढा खासदारांनी वाचल्यानंतर केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, ए. टी. पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यभरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. एप्रिल २०१५ अखेरपर्यंत नाशिक विभागात मंजूर झालेल्या २५५ कामांपैकी १९४ कामे पूर्ण झाली आहेत, तर ६१ कामे निधीअभावी रखडली आहेत. या कामांसाठी ४१८ कोटी ९१ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात २८५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने त्यातून १९४ कामेच पूर्ण करता आली, तर उर्वरित ६१ कामांसाठी लागणारा ११८ कोटी ९३ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असल्याने विभागातील योजनेअंतर्गत कामे खोळंबली आहेत. दरम्यान, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेकरिता पुरेशा निधीची तरतूद केली नसल्यानेच निधीची चणचण भासत असल्याची कबुलीही भगत यांनी दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांनी पेठ, सुरगाणा या भागात या योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली.