शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
2
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल
3
अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न
5
जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण
6
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
7
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
8
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
9
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
10
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
11
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर
12
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
13
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
14
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
15
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
16
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
17
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
18
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
19
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
20
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा

मूर्ती दानाची आकडेवारी शंकास्पद

By admin | Updated: September 30, 2015 00:11 IST

मूर्ती दानाची आकडेवारी शंकास्पद

नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककरांनी दिलेले दान भरून पावले आणि तब्बल दोन लाख ७१ हजार विसर्जित गणेशमूर्तींचे दान पालिका आणि सहयोगी संस्थांना प्राप्त झाले, असा दावा महापालिकेने केला असला तरी, नाशिकची लोकसंख्या आणि त्यातही गणेश प्रतिष्ठापना करण्याची संख्या याचे गुणोत्तर पाहिले तर हा दावाच शंकेला कारणीभूत ठरणारा आहे. त्यामुळे महापालिकेकडून अशा प्रकारची दिशाभूल कशासाठी असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही.पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला काही सेवाभावी संस्था आणि नंतर नाशिक महापालिकेसारख्या निमशासकीय संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे धार्मिकता जोपासतानाच पर्यावरणाचे भान राखणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी औपचारिकता म्हणून नदीपात्रात बुडवलेली मूर्ती स्वयंसेवी संस्था म्हणजेच पर्यायाने पालिकेकडे दिली जाते. पालिकाच या मूर्तींचे उत्तरदायित्व स्वीकारते. दिवसेंदिवस पालिकेच्या आवाहनाला साथ मिळावी म्हणून कृत्रिम कुंडांची संख्याही वाढत आहे. त्याचाच फायदा पालिकेला झाला आणि यंदा २ लाख ७१ हजार ३८६ मूर्तींचे दान पालिकेला मिळाले म्हणजे इतक्या मूर्ती नदीपात्रात जाण्यापासून वाचल्या, असा दावा पालिकेने केला आहे. खासगी स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारलेल्या मूर्ती दानाचे आकडे बघितले तर मूर्ती दानाची ही संख्या तीन लाखांपेक्षा अधिक होऊ शकेल, तथापि, त्याला आधार नाही म्हणून तूर्तास पालिकेने दिलेली आकडेवारी मान्य केली आणि आत्तापर्यंतचा मूर्ती दान स्वीकारण्याचा एक विक्रम मानला तरी त्यातून अनेक शंका निर्माण होतात.२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार नाशिक महापालिका हद्दीतील लोकसंख्या १४ लाख ८६ हजार ०५३ इतकी आहे. त्यात हिंदू धर्मीयांची संख्या १२ लाख ६६ हजार २०७ इतकी आहे. असे सरकारचेच आकडे आहेत. हिंदंूचे एक कुटुंब चार माणसाचे आहे, असे धरले तर हिंदू कुटुंबीयांची एकूण घरे तीन लाख होतात. सामान्यत: घरात एकच गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करतात. त्याचा विचार केला तर तीन लाख म्हणजे शंभर टक्के घरांमध्ये गणपती बसतात, असे मानायचे काय, पालिकेला दोन लाख ७१ हजार मूर्तींचे दान मिळाले असल्याचा दावा आहे, परंतु अनेक घरांमध्ये गणपती दहा दिवस नसतात. काही घरांमध्ये दीड दिवसाचा, तर काहींकडे तीन, पाच आणि सात दिवस गणपती असतो. अनेक कुटुंबांमध्ये तर गौरीच्या पाठवणीबरोबरच गणपतीचे विसर्जन होते. मग, त्यांचे काय झाले, त्यांची आकडेवारी एकत्र केली, तर शंभर टक्के घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती, असा अर्थ निघू शकतो. मुळात शंभर टक्केघरात गणेश प्रतिष्ठापना होत नाही ही वस्तुस्थिती आहे. इतकेच नव्हे तर काही मूर्तींचे अनंत चतुर्दशीपूर्वी विसर्जन होते याचा विचार केला, तर ही पालिकेची आकडेवारी निखालस फसवी असल्याचेच स्पष्ट होते.