शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती दानाची आकडेवारी शंकास्पद

By admin | Updated: September 30, 2015 00:11 IST

मूर्ती दानाची आकडेवारी शंकास्पद

नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककरांनी दिलेले दान भरून पावले आणि तब्बल दोन लाख ७१ हजार विसर्जित गणेशमूर्तींचे दान पालिका आणि सहयोगी संस्थांना प्राप्त झाले, असा दावा महापालिकेने केला असला तरी, नाशिकची लोकसंख्या आणि त्यातही गणेश प्रतिष्ठापना करण्याची संख्या याचे गुणोत्तर पाहिले तर हा दावाच शंकेला कारणीभूत ठरणारा आहे. त्यामुळे महापालिकेकडून अशा प्रकारची दिशाभूल कशासाठी असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही.पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला काही सेवाभावी संस्था आणि नंतर नाशिक महापालिकेसारख्या निमशासकीय संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे धार्मिकता जोपासतानाच पर्यावरणाचे भान राखणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी औपचारिकता म्हणून नदीपात्रात बुडवलेली मूर्ती स्वयंसेवी संस्था म्हणजेच पर्यायाने पालिकेकडे दिली जाते. पालिकाच या मूर्तींचे उत्तरदायित्व स्वीकारते. दिवसेंदिवस पालिकेच्या आवाहनाला साथ मिळावी म्हणून कृत्रिम कुंडांची संख्याही वाढत आहे. त्याचाच फायदा पालिकेला झाला आणि यंदा २ लाख ७१ हजार ३८६ मूर्तींचे दान पालिकेला मिळाले म्हणजे इतक्या मूर्ती नदीपात्रात जाण्यापासून वाचल्या, असा दावा पालिकेने केला आहे. खासगी स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारलेल्या मूर्ती दानाचे आकडे बघितले तर मूर्ती दानाची ही संख्या तीन लाखांपेक्षा अधिक होऊ शकेल, तथापि, त्याला आधार नाही म्हणून तूर्तास पालिकेने दिलेली आकडेवारी मान्य केली आणि आत्तापर्यंतचा मूर्ती दान स्वीकारण्याचा एक विक्रम मानला तरी त्यातून अनेक शंका निर्माण होतात.२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार नाशिक महापालिका हद्दीतील लोकसंख्या १४ लाख ८६ हजार ०५३ इतकी आहे. त्यात हिंदू धर्मीयांची संख्या १२ लाख ६६ हजार २०७ इतकी आहे. असे सरकारचेच आकडे आहेत. हिंदंूचे एक कुटुंब चार माणसाचे आहे, असे धरले तर हिंदू कुटुंबीयांची एकूण घरे तीन लाख होतात. सामान्यत: घरात एकच गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करतात. त्याचा विचार केला तर तीन लाख म्हणजे शंभर टक्के घरांमध्ये गणपती बसतात, असे मानायचे काय, पालिकेला दोन लाख ७१ हजार मूर्तींचे दान मिळाले असल्याचा दावा आहे, परंतु अनेक घरांमध्ये गणपती दहा दिवस नसतात. काही घरांमध्ये दीड दिवसाचा, तर काहींकडे तीन, पाच आणि सात दिवस गणपती असतो. अनेक कुटुंबांमध्ये तर गौरीच्या पाठवणीबरोबरच गणपतीचे विसर्जन होते. मग, त्यांचे काय झाले, त्यांची आकडेवारी एकत्र केली, तर शंभर टक्के घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती, असा अर्थ निघू शकतो. मुळात शंभर टक्केघरात गणेश प्रतिष्ठापना होत नाही ही वस्तुस्थिती आहे. इतकेच नव्हे तर काही मूर्तींचे अनंत चतुर्दशीपूर्वी विसर्जन होते याचा विचार केला, तर ही पालिकेची आकडेवारी निखालस फसवी असल्याचेच स्पष्ट होते.