शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती

By admin | Updated: August 15, 2014 01:01 IST

शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती

 

सिन्नर : राज्य आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत असले तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यातील केवळ अठरा टक्के जमीन सिंचनाखाली आहे, तर ८२ टक्के क्षेत्र जिरायती आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे असून, शेतकऱ्यांचा विकास झाला तरच राज्याची प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोमलवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचा साखळी बंधारा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती राजेश नवाळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, सुकदेव बनकर, व्ही.सी. वखारे, सरपंच संजय बोऱ्हाडे, जे.एम. लिहीतकर, आनंद मोरे, शशिकांत मंगरुळे, अविनाश लोखंडे आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पाणीटंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात राज्यात एक हजार ७०० बांध बांधण्यात आले असून, आता दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साखळी बंधाऱ्यांचा उपक्रम चांगला असून, त्यासाठी किमान पाऊस पडण्याची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. टॅँकरची संख्या कमी करण्यासाठीच साखळी बंधाऱ्याचा उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले. पडलेल्या पावसाचा थेंब अन् थेंब साठविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील ५७ टक्के जनता शेतीच्या उत्पन्नावर निर्भर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कांद्याच्या किमतीबाबत बोलताना ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार सोबत आपण शेवटपर्यंत भांडत राहणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख कमी करून क्रांती घडवून आणण्यासाठी आपत्तीचा धाडसाने सामना करण्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असे म्हणणे चुकीचे असून, केंद्राकडून राज्य शासनाने ११ हजार कोटी रुपये आणून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे जलसंधारणमंत्री राऊत यांनी सांगितले. दुष्काळमुक्त वातावरण निर्मितीला मुख्यमंत्र्यांची मदत झाल्याचे राऊत म्हणाले. टंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा जलसंधारण खात्याचा प्रयत्न असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमदार कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वडांगळी व कीर्तांगळी येथे कोटा बंधाऱ्याचे, खोपडी येथे देवनदीवरील पूर कालव्याच्या कामाचे तर मुसळगाव येथे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. सुमारे ५७ कोटी रुपयांच्या निधीतून देवनदीवरून पूर्वभागासाठी करण्यात येणाऱ्या पूर कालव्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भरपावसात अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, दिलीपराव शिंदे, राजेंद्र चव्हाणके, रामदास खुळे, राजेंद्र घुमरे, विजय काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)भावना व्यक्त केली.