शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती

By admin | Updated: August 15, 2014 01:01 IST

शेतकऱ्यांच्या विकासातच राज्याची प्रगती

 

सिन्नर : राज्य आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत असले तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यातील केवळ अठरा टक्के जमीन सिंचनाखाली आहे, तर ८२ टक्के क्षेत्र जिरायती आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे असून, शेतकऱ्यांचा विकास झाला तरच राज्याची प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोमलवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचा साखळी बंधारा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती राजेश नवाळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, सुकदेव बनकर, व्ही.सी. वखारे, सरपंच संजय बोऱ्हाडे, जे.एम. लिहीतकर, आनंद मोरे, शशिकांत मंगरुळे, अविनाश लोखंडे आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पाणीटंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात राज्यात एक हजार ७०० बांध बांधण्यात आले असून, आता दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साखळी बंधाऱ्यांचा उपक्रम चांगला असून, त्यासाठी किमान पाऊस पडण्याची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. टॅँकरची संख्या कमी करण्यासाठीच साखळी बंधाऱ्याचा उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले. पडलेल्या पावसाचा थेंब अन् थेंब साठविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील ५७ टक्के जनता शेतीच्या उत्पन्नावर निर्भर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कांद्याच्या किमतीबाबत बोलताना ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार सोबत आपण शेवटपर्यंत भांडत राहणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख कमी करून क्रांती घडवून आणण्यासाठी आपत्तीचा धाडसाने सामना करण्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असे म्हणणे चुकीचे असून, केंद्राकडून राज्य शासनाने ११ हजार कोटी रुपये आणून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे जलसंधारणमंत्री राऊत यांनी सांगितले. दुष्काळमुक्त वातावरण निर्मितीला मुख्यमंत्र्यांची मदत झाल्याचे राऊत म्हणाले. टंचाई असणाऱ्या गावांमध्ये बंधारे बांधून टंचाई दूर करण्याचा जलसंधारण खात्याचा प्रयत्न असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमदार कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वडांगळी व कीर्तांगळी येथे कोटा बंधाऱ्याचे, खोपडी येथे देवनदीवरील पूर कालव्याच्या कामाचे तर मुसळगाव येथे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. सुमारे ५७ कोटी रुपयांच्या निधीतून देवनदीवरून पूर्वभागासाठी करण्यात येणाऱ्या पूर कालव्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भरपावसात अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, दिलीपराव शिंदे, राजेंद्र चव्हाणके, रामदास खुळे, राजेंद्र घुमरे, विजय काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)भावना व्यक्त केली.