शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

ठेकेदारीचा कर्मचाºयांना फटका राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय कंत्राटी पद्धतीने होणार काम एसटीतील सफाई कर्मचाºयांची पदे गोठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:31 IST

नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅण्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाºयांची पदे गोठविण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे१५० कर्मचाºयांना आता इतर विभागांत ढकलले जाणार कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना

नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅण्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाºयांची पदे गोठविण्यात आली आहेत. महामंडळाच्या स्वच्छता विभागाचे खासगीकरण करताना या विभागात काम करणाºयांची पदे गोठविण्यात आल्याने नाशिक विभागात काम करणाºया सुमारे १५० कर्मचाºयांना आता इतर विभागांत ढकलले जाणार आहे.राज्य परिवहन महामंडळात सध्या वेतन करार तसेच एसटीला होणारा तोटा या भोवतीच संपूर्ण राजकारण फिरत आहे. त्यामुळे २० महिन्यांपासून वेतन कराराचा प्रश्न प्रलंबित आहे. दुसरीकडे एसटीने तोटादेखील जाहीर केला आहे. असे असताना महामंडळात मात्र खासगीकरण आणि नूतनीकरणाबरोबरच खरेदी, पदभरतीच्या संदर्भात अनेक निर्णय घेतले जात आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाºयांमध्येच संभ्रमावस्था असून, खासगीकरण आणि कंत्राटीकरण पुढे येत असल्याने कर्मचाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व आगारांमधील बसची स्वच्छता तसेच सफाई कामांचे कंत्राटीकरण केलेले आहे. सुमारे ४५० कोटींचा हा करार करण्यात आल्याची चर्चा असून, नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे १२५ कोटींचे कंत्राट देण्यात आल्याचे समजते. कंत्राटदाराला स्वच्छता कामासाठी त्याच्याकडील कर्मचारी नियुक्तीची परवानगी असल्याने खासगीकरणातून त्यांनी काही कर्मचारी कामावरही आणले आहेत. परंतु मूळ एसटीतील स्वच्छता आणि सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालेली आणि रुजू होणाºया अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ही पदे आता एसटीच्या आस्थापनेवरून गोठविण्यात आली असल्याने अनुकंपावरील कर्मचाºयांच्या नियुक्तीचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. एसटीमध्ये पाच टक्के अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. ही बहुतांश नेमणूक स्वच्छता आणि स्वच्छक कर्मचाºयांच्या रूपात होत असते. कारण अनुकंपाधारक म्हणून बहुतांश महिला आणि मुले अल्पशिक्षित असतात. काहींचे वयदेखील अधिक असते. अशा कर्मचाºयांना एसटीतील इतर विभागांत काम देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले जाते. परंतु आता स्वच्छता कामाचे खासगीकरण झाल्याने आणि सफाई कर्मचारी, स्वच्छकाची पदे गोठविण्यात आल्यामुळे यापुढे या पदांवर कोणत्याही प्रकारची भरती होऊ शकणार नाही.कर्मचाºयांवर अन्यायराज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता कामाचे खासगीकरण केल्यामुळे अनेक कर्मचाºयांच्या रोेजगाराचा प्रश्न आहे. या कर्मचाºयांसाठी महामंडळानेच त्यांना ९० दिवसांचे ट्रेनिंग देऊन त्यांना कनिष्ठ सहायक म्हणून नोकरीची हमी दिली पाहिजे. स्वच्छतेची काही कामे पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहेत. त्या कामावरही हक्काने काम मिळणार नसेल तर नाराजी नक्कीच पसरेल. ही पदे न गोठविता कर्मचाºयांना इतरत्र सामावून घेतले पाहिजे.