शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचे केंद्रापुढे लोटांगण राजेंद्र जाधव यांचा आरोप : महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:28 IST

नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे

नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी विधानसभेत घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार-पार, दमणगंगा, पिंजाळ या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़राज्य सरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून योग्य ती कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा आमदार जयंत जाधव यांनी दिला आहे़ राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून राज्याच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखला आहे़ या प्रकल्पाबरोबरच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करीत नाही, असा प्रश्नही जाधव यांनी केला आहे़ चितळे समितीने नार-पार खोऱ्यात प्रत्यक्षात ५० टीएमसी पाणी असल्याचा अहवाल दिला आहे़ तर राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणानुसार खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे़ तापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देऊन खोºयातील १९़३८ टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हटले आहे़ असे असताना राज्य सरकारने केवळ १०़५० टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देऊन निधी मंजूर केला़ त्यामुळे उर्वरित पाणी हे नार-पार-तापी खोºयातून गुुजरातला पळविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे़ नार-पार, दमणगंगा-एकदरे खोºयामध्ये १३३ टीएमसी पाणी असून, ते नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य आहे. यासाठी तयार करण्यात येणाºया प्रकल्पांच्या अहवालासाठी सुमारे शंभर कोटींचा खर्च येणार आहे़ या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे), येवला, नांदगाव व चांदवड या तालुक्यांसह जळगाव, धुळे हे जिल्हे तसेच मराठवाड्यालाही पाणी मिळणार आहे़ त्यामुळे सरकारने या सर्व प्रकल्पांचे अहवाल तातडीने तयार करावेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केली़ यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते़