शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

राज्य सरकारचे केंद्रापुढे लोटांगण राजेंद्र जाधव यांचा आरोप : महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:28 IST

नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे

नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी विधानसभेत घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार-पार, दमणगंगा, पिंजाळ या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़राज्य सरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून योग्य ती कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा आमदार जयंत जाधव यांनी दिला आहे़ राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून राज्याच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखला आहे़ या प्रकल्पाबरोबरच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करीत नाही, असा प्रश्नही जाधव यांनी केला आहे़ चितळे समितीने नार-पार खोऱ्यात प्रत्यक्षात ५० टीएमसी पाणी असल्याचा अहवाल दिला आहे़ तर राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणानुसार खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे़ तापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देऊन खोºयातील १९़३८ टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हटले आहे़ असे असताना राज्य सरकारने केवळ १०़५० टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देऊन निधी मंजूर केला़ त्यामुळे उर्वरित पाणी हे नार-पार-तापी खोºयातून गुुजरातला पळविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे़ नार-पार, दमणगंगा-एकदरे खोºयामध्ये १३३ टीएमसी पाणी असून, ते नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य आहे. यासाठी तयार करण्यात येणाºया प्रकल्पांच्या अहवालासाठी सुमारे शंभर कोटींचा खर्च येणार आहे़ या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे), येवला, नांदगाव व चांदवड या तालुक्यांसह जळगाव, धुळे हे जिल्हे तसेच मराठवाड्यालाही पाणी मिळणार आहे़ त्यामुळे सरकारने या सर्व प्रकल्पांचे अहवाल तातडीने तयार करावेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केली़ यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते़